Special Report | ओबीसींचं राजकीय आरक्षण संपुष्टात तर नाही ना ?

| Updated on: Sep 13, 2021 | 10:39 PM

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना राज्यातील 5 जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि एका जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापल्याचं पाहायला मिळतंय. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला जात आहे. ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येतेय. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केलीय. 

Follow us on

ओबीसी आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित असताना राज्यातील 5 जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि एका जिल्हा परिषदेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापल्याचं पाहायला मिळतंय. विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडून राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला जात आहे. अशावेळी काँग्रेस नेते आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत मार्ग सांगितला आहे. इम्पिरिकल डेटा उपलब्ध झाला नाही आणि निवडणुका धडकल्या तर अध्यादेश आणला जाईल, असं वडेट्टीवार यांनी जाहीर केलं आहे.

दरम्यान, ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या मुद्द्यावरुन विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांकडून राज्य सरकारवर टीका करण्यात येतेय. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी राज्य सरकारवर टीका केलीय.