आमदार बच्चू कडू यांच्या नाराजी चर्चांवर सुनील प्रभू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. सत्तापक्षात प्रचंड अवस्थता असल्याचे सुनील प्रभू म्हणाले. गोविंदांना देण्यात येत असलेल्या 10 लाखांच्या विमाची अंमलबजावणी कशी करणार याबद्दल शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. सरकारने फक्त घोषणा केली आहे मात्र त्याचा लाभ कसा घेता येणार याबद्दल कुठलीही माहिती दिली नसल्याचे प्रभू यावेळी म्हणाले. तसेच दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा मिळावा अशी मागणीही त्यांनी केली आहे. सध्या पावसाळी अधिवेश सुरु आहे. यामध्ये या मागण्या पूर्ण कराव्या असे आमदार प्रभू म्हणाले.