शिंदे सरकारने राज्यातील जनतेला दिवाळीचे पॅकेज दिलं आहे. राज्यातील 7 कोटी रेशनकार्डधारकांना 100 रूपयांत तेल, साखर, रवा आणि चना डाळ देण्यात येणार आहे. तर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला अर्जून खोतकर यांचे हजारो कार्यकर्ते जालन्यातून निघाले आहेत. मात्र यावेळी बंद असलेल्या समृद्धी महामार्गाचा वापर करण्यात आला. तर औरंगाबदच्या सिल्लोडमधूनही शिंदेंच्या दसरा मेळाव्यासाठी 500 बसेस मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. तर सिंधुदुर्गमधून उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते रेल्वेने रवाना झाले आहेत. तर आता सेनेच्या दसरा मेळाव्यासाठी पुण्यातूनही शिवसैनिकांची तयारी झाली आहे.