रिफायनरीच्या पत्रानंतर शिवसेनेत नाराजी, आगामी काळात सेनेत मोठी गळती होण्याची शक्यता
मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर शिवसेनेत प्रचंड मोठी नाराजी असल्याचं समोर आलं आहे. रिफायनरीसाठी चर्चेत असलेल्या गावांमध्ये सेना संपर्क अभियान राबवणार नाही! अशी भूमिका घेण्यात आली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रानंतर शिवसेनेत प्रचंड मोठी नाराजी असल्याचं समोर आलं आहे. रिफायनरीसाठी चर्चेत असलेल्या गावांमध्ये सेना संपर्क अभियान राबवणार नाही! अशी भूमिका घेण्यात आली आहे. स्थानिकांमध्ये असलेल्या रोषातून गंभीर प्रकार घडण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. तर, मुख्यमंत्र्यांनी विश्वासात न घेतल्याची स्थानिक कार्यकर्ते,नेत्यांची भावना असल्याच समोर आलं आहे. आगामी काळात शिवसेनेत मोठी गळती होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे. ‘बालेकिल्ला’ म्हणून ओळख असलेला मतदारसंघातील नाराजी शिवसेनेला परवडणारी? का असा सवाल केला जात आहे.
