
मुंबईत उन्हाच्या काहिलीनंतर बरसल्या अवकाळीच्या धारा
गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाका मुंबईमध्ये वाढलेला असतानाच ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे
मुंबई : गेल्या काही दिवसात राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील झालीय. यामुळे राज्यात गारवा अनुभवायला मिळत होता. याच गारव्याचा अनुभव मुंबईकरांना देखिल आज मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाका मुंबईमध्ये वाढलेला असतानाच ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या मुंबईकरांचे चांगलीच तारांबळ उडालेली पाहायला मिळत आहे. तर उन्हाचा तडाखा त्यानंतर आता अवकाळी पाऊस यामुळे मुंबईकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी असे देखील आवाहन डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. तर पुढील काही दिवस पावसाच्या सरी बरसत राहतील असा अंदाज हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
Published on: Mar 21, 2023 9:16 AM
Related Video
टीव्ही अभिनेत्याच्या विधानाची चर्चा, म्हणाला की, लग्नानंतर पण...
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
शिंदे गटात जाताच सचिन अहिर ठाकरेंवर बरसले, पहिल्या प्रतिक्रियेत थेट...
भाजप की शिंदे गट, ठाणे जिल्हा बँकेचं अध्यक्षपद कोणाकडे जाणार?
ठाकरे गटाला लवकरच आणखी मोठा धक्का? सचिन अहिर नंतर काही आमदार...
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
भाजपच्या बड्या नेत्याने स्पष्टच सांगितलं; ही तर सुरुवात, ठाकरे गटाला..