धुळे : जिल्ह्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे. तसेच अनेक ठिकाणी घरांची देखील पडझड झाल्याचे पहायला मिळाले. धुळे जिल्ह्यातील कुरुकवडे गावात झालेल्या अवकाळी पावसामुळे दहा ते बारा घरे पडल्याची घटना घडली. या घटनेमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्याने, नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.