Maharashtra News LIVE : मुख्यमंत्र्यांची सही असली पाहिजे, दुसरं म्हणजे.. मनोज जरांगेंची मोठी मागणी
Maharashtra News LIVE : धाराशिव जिल्ह्यामध्ये डीजे संदर्भात या गणेशोत्सवात पहिला गुन्हा दाखल. गणेश आगमन मिरवणुकीत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डॉल्बी वाजवल्याचा ठपका. पोलिसांच्या सूचनांचे उल्लंघन केल्याप्रकरणी धाराशिव शहरात दोन,तेरखेड्यात एक गुन्हा. डॉल्बी साउंड सिस्टिम ऑपरेटरसह तिघांवर पोलिसांची कारवाई.

LIVE NEWS & UPDATES
-
मुख्यमंत्र्यांची सही असली पाहिजे, दुसरं म्हणजे.. मनोज जरांगेंची मोठी मागणी
“58 लाखातील एकही नोंद कमी होणार नाही याची खात्री हवी. त्यावर मुख्यमंत्र्यांची सही असावी. दुसरं हैदराबाद गॅझेट नावानुसार, संख्येनुसार मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन वॅलिडिटी द्यावी लागेल” अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
-
नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके यांचा मोठा निर्णय
जिंदाल कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश. मृत सिद्धार्थ गोरेंचा रस्त्यावर आडवा टाकलेल्या पाईपच्या धडकेत झाला होता अपघात. जिंदाल कंपनीकडे गंगापूर थेट जलवाहिनीचे कंत्राट आहे. सिद्धार्थ गोरेंच्या मृत्यूला जिंदाल कंपनी जबाबदार असल्याचा ठेवला ठपका. कामाच्या दरम्यान निष्काळजीपणा आढळून आल्यानं महापौरांनी दिले आदेश.
-
-
अखेर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं
मनोज जरांंगे पाटील यांनी मागच्या अनेक दिवसांपासून सुरु असलेलं आमरण उपोषण आज सोडलं. विखे पाटील, दादा भुसे, प्रसाद लाड या सरकारी शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी काही अटींवर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं.
मनोज जरांगे पाटील यांनी मागच्या अनेक दिवसांपासून सुरु असलेले आमरण उपोषण आज सोडलं. विखे पाटील, दादा भुसे, प्रसाद लाड या सरकारी शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी काही अटींवर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडलं. शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह यावर आज सलग तिसऱ्यादिवशी सुनावणी होणार आहे. सध्या एकनाथ शिंदे शिवसेनेचा युक्तीवाद सुरु आहे. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून बीड-पुणे एक्स्प्रेस रेल्वेचा शुभारंभ. अनेक दशकांपासूनचे बीडवासीयांचे हे स्वप्न आज साकार होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऑनलाइन उपस्थितीत उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते हा सोहळा पार पडेल. मंत्री पंकजा मुंडे, खासदार बजरंग सोनवणेंसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींची असणार उपस्थिती.नंदुरबार जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने कापूस उत्पादक शेतकरी संकटात. अडीच ते तीन महिन्यांपासून पावसाची प्रतीक्षा कायम. पावसाअभावी कापूस पिकाची वाढ खुंटली. कापसाच्या बोंडवरही पावसाचा परिणाम. पिकांसाठी केलेला खर्च निघणार का? शेतकऱ्यांची चिंता वाढली.
Published On - Sep 17,2026 8:22 AM
