AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ladki Bahin Yojna: राज्य सरकारचा मोठा निर्णय! अपात्र ठरलेल्या लाडक्या बहि‍णींना… नेमकं काय?

Ladki Bahin Yojna: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' ही सर्वाधिक चर्चेत असलेली आणि महायुतीसाठी गेम चेंजर ठरलेली योजना आहे. मात्र, ज्या महिलांची ई-केवायसी प्रक्रिया केली नाही त्यांची नावे या योजनेतून काढून टाकण्यात आली होती. आता या प्रकरणी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

| Updated on: May 17, 2026 | 1:20 PM
Share
राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबाबत महिलांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अपूर्ण राहिली होती, अथवा फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरली गेली होती, अशा महिलांना आपली कागदपत्रे दुरुस्त करण्यासाठी सरकारने आणखी एक संधी दिली आहे.

राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबाबत महिलांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अपूर्ण राहिली होती, अथवा फॉर्ममध्ये चुकीची माहिती भरली गेली होती, अशा महिलांना आपली कागदपत्रे दुरुस्त करण्यासाठी सरकारने आणखी एक संधी दिली आहे.

1 / 6
या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी सक्तीचे करण्यात आले होते. मात्र तांत्रिक चुका आणि अपूर्ण कागदपत्रांमुळे लाखो महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली होती. दुरुस्तीसाठी दिलेली ३० एप्रिलची मुदत संपल्यानंतरही अनेक महिला आवश्यक कागदपत्रे जमा करू शकल्या नव्हती. त्यामुळे आता प्रशासनाने एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये या सामाजिक उद्देशाने ही विशेष सवलत जाहीर केली आहे.

या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी सक्तीचे करण्यात आले होते. मात्र तांत्रिक चुका आणि अपूर्ण कागदपत्रांमुळे लाखो महिलांची नावे या योजनेतून वगळण्यात आली होती. दुरुस्तीसाठी दिलेली ३० एप्रिलची मुदत संपल्यानंतरही अनेक महिला आवश्यक कागदपत्रे जमा करू शकल्या नव्हती. त्यामुळे आता प्रशासनाने एकही पात्र महिला या योजनेपासून वंचित राहू नये या सामाजिक उद्देशाने ही विशेष सवलत जाहीर केली आहे.

2 / 6
ज्या महिलांचा लाभ तांत्रिक कारणांमुळे बंद झाला आहे, त्या आता थेट आपल्या जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करू शकतात. तिथे या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली जाईल आणि त्यात पात्र ठरणाऱ्या महिलांचा हप्ता पुन्हा सुरू करण्यात येईल.

ज्या महिलांचा लाभ तांत्रिक कारणांमुळे बंद झाला आहे, त्या आता थेट आपल्या जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे सादर करू शकतात. तिथे या कागदपत्रांची पुन्हा पडताळणी केली जाईल आणि त्यात पात्र ठरणाऱ्या महिलांचा हप्ता पुन्हा सुरू करण्यात येईल.

3 / 6
दरम्यान, राज्य सरकारने नुकताच १४ आणि १५ मे रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात मार्च आणि एप्रिल अशा दोन महिन्यांचा मिळून एकूण ३ हजार रुपयांचा हप्ता थेट वर्ग केला आहे, ज्यामुळे लाखो लाभार्थी महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

दरम्यान, राज्य सरकारने नुकताच १४ आणि १५ मे रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात मार्च आणि एप्रिल अशा दोन महिन्यांचा मिळून एकूण ३ हजार रुपयांचा हप्ता थेट वर्ग केला आहे, ज्यामुळे लाखो लाभार्थी महिलांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे.

4 / 6
दुसरीकडे, सरकारच्या कठोर पडताळणी प्रक्रियेदरम्यान जवळपास ६६ ते ७६ लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्याचे समोर आले आहे. यामध्ये निकषात न बसणाऱ्या महिला, चुकीची माहिती देणारे अर्ज आणि दुहेरी नोंदणी (Double Registration) झालेल्या प्रकरणांचा समावेश आहे.

दुसरीकडे, सरकारच्या कठोर पडताळणी प्रक्रियेदरम्यान जवळपास ६६ ते ७६ लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्याचे समोर आले आहे. यामध्ये निकषात न बसणाऱ्या महिला, चुकीची माहिती देणारे अर्ज आणि दुहेरी नोंदणी (Double Registration) झालेल्या प्रकरणांचा समावेश आहे.

5 / 6
प्रशासनाने आता केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आपली डिजिटल पडताळणी यंत्रणा अधिक मजबूत केली असून, ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी आहेत त्यांनी तातडीने संबंधित कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन केले आहे.

प्रशासनाने आता केवळ पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आपली डिजिटल पडताळणी यंत्रणा अधिक मजबूत केली असून, ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी आहेत त्यांनी तातडीने संबंधित कार्यालयात जाऊन कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन केले आहे.

6 / 6
Follow Us
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय....
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर...
लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार, शिंदेंनाही हवय कॅबिनेट
शिंदेंनाही हवंय आणखी एक कॅबिनेट, लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार?
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... बड्या नेत्याचे विधान
अमृता फडणवीस यांची दिल्लीला जाण्याची मानसिकता... एकीकडे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चर्चा, दुसरीकडे बड्या नेत्याचे सुचक विधान
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल,
पालकमंत्री झाल्यावर गिरीश महाजन पहिल्यांदाच नाशकात दाखल, जंगी स्वागताच व्हिडीओ तुफान व्हायरल
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीस...
मोठी बातमी! थेट अमेरिकेसोबत महत्त्वाची डील; CM फडणवीसांच्या उपस्थितीत करार मंजूर
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार...
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मोठा फेरबदल? दोन डझन मंत्री बदलणार, इतकेच काय तर शिंदे गट...
चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार,
पुणे : चिमुकलीला गपचूप शेतात नेलं अन्... आमदाराच्या गावातच हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?