AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange: आता आश्वासन नको… आंदोलन थांबवणार की नाही?… सरकारच्या शिष्टमंडळाला भेटण्यापूर्वीच मनोज जरांगेंचा तो थेट इशारा

Manoj Jarange Hunger Strike: मराठा आरक्षणासंदर्भातील काही प्रलंबित मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे शस्त्र पुन्हा पाजळले आहे. त्यानंतर मुंबईत हालचाली वाढल्या. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, आमदार बच्चू कडू यांच्यासह सरकार अंतरवाली सराटीत हजर होईल.

Manoj Jarange: आता आश्वासन नको... आंदोलन थांबवणार की नाही?... सरकारच्या शिष्टमंडळाला भेटण्यापूर्वीच मनोज जरांगेंचा तो थेट इशारा
मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: May 29, 2026 | 10:40 AM
Share

Manoj Jarange and Radhakrushana Vikhe Patil: मराठा आरक्षणासंदर्भातील काही मागण्या प्रलंबित असल्याच्या नाराजीने मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यानंतर तातडीने काल मुंबईसह सरकार दरबारी हालचाली वाढल्या. मराठा उपसमितीचे अध्यक्ष आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री उदय सामंत, आमदार बच्चू कडू यांच्यासह सरकार अंतरवाली सराटीत दाखल होत आहे. या घडामोडी घडत असतानाच मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आता आश्वासन नको असे स्पष्ट केले. त्यांनी उद्याचं आंदोलन होणार, आता थांबणार नाही असा थेट इशारा दिला.

आमरण उपोषण मागे नाही

यापूर्वी तर सांगितले होते की, १५०० गुन्हे होते. ८३४ गुन्हे मागे घेतले. आता सरकार ६४ गुन्हे मागे घ्यायचे राहिले असे म्हणत असेल तर बघू. सरकारची भूमिका ऐकून निर्णय घेणार आहे. आश्वासन त्यांनी दिलं होतं. त्याला आम्ही सन्मान दिला. पण आश्वासन दिल्याने माझा समाज मोठा होणार आहे का? २९ ऑगस्ट ते २९ मे असा दहा महिने वेळ दिला. समाजाने सरकारला मोठा वेळ दिला. उपोषण तर फायनल आहे. यापूर्वी तीन वर्ष थांबलो. आताही दहा महिने थांबलो. दहा महिन्यांचा कालावधी हा काही थोडा वेळ नाही. केवळ वेळ आणि चालढकल होत आहे. आता 15 मेपासून मोठा वेळ मिळाला. १६ दिवस मिळाले. मी रितीच्या, कायद्याच्या बाहेर बोलत नाही. मी सर्व संकेत पाळतो. मग का माघार घ्यायची? माझ्या समाजाने का माघार घ्यायची असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.

सरकार भावनाशून्य झालंय का?

उन्हात जाळून घेण्याची आम्हाला हौस आहे का? हे का साधं काम आहे का? सरकार मराठ्यांची अग्निपरीक्षा घेत आहे. हा साधासोपा विषय नाही. सरकार एसीत बसलेले आहे. ही मोठी अग्निपरीक्षा आहे. ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये. याच मराठा समाजाने सरकारला सत्तेत बसवले आहे. त्यांनाच उन्हातान्हात तुम्ही होरपवळणार का? मराठा समाजाच्या मुलांसाठी, कल्याणासाठी मी हे करतोय. पण सरकारला दयामायाच नाही का, भावनाच नाही का? हे सरकार भावनाशून्य आहे का? तुम्ही कोणत्या हिंदू धर्माची परंपरा, वारकरी संप्रदायाची परंपरा चालवताय.गोरगरिब मराठ्यांचा तुम्ही उन्हाळा का करताय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी विचारला.

Follow Us
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल
ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा
Uday Samant | ऑपरेशन टायगर तुम्हाला सांगून होणार नाही! उदय सामंतांचा सूचक इशारा; महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत
मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना
Cabinet Meeting Update | मंत्रिमंडळ बैठकीला एकनाथ शिंदेंची दांडी; थेट दिल्लीला रवाना, सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीपूर्वी मोठी खलबतं!
सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील...
Subhash Chandra | सुभाष चंद्रा यांना मोठा झटका! 22 हजार कोटींच्या कर्ज सेटलमेंटवरील NCLTचा आदेश रद्द
भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना...
PM Modi | भारताची अर्थव्यवस्था 7.8% वेगाने धावली! मोदींचं कौतुक; विरोधकांना म्हणाले, निराशा पसरवू नका...
ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! मुंबईकडे कूच करण्यावर ठाम
OBC Morcha | ओबीसी एल्गार मोर्चा पाटस टोलनाक्यावर धडकला! लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात आंदोलक आक्रमक; मुंबईकडे कूच करण्यावर ठाम