AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धवजी… तुम्ही देशाचे पंतप्रधान नियुक्त करताय… संजय राऊत यांनी सांगितलेला किस्सा काय?

Sanjay Raut Big Statement : खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाने प्रकाशनापूर्वीच राजकारणात एकच खळबळ उडवली आहे. एकाहून एक दावे, प्रतिदावे, गौप्यस्फोट बाहेर येत आहे. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यातच त्यांनी पंतप्रधानांविषयीचा एक मोठा दावा केला आहे.

उद्धवजी... तुम्ही देशाचे पंतप्रधान नियुक्त करताय... संजय राऊत यांनी सांगितलेला किस्सा काय?
संजय राऊत, उद्धव ठाकरेImage Credit source: गुगल
| Updated on: May 17, 2025 | 11:12 AM
Share

खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातील स्वर्ग’ या पुस्तकाचे आज संध्याकाळी प्रकाशन होत आहे. त्यापूर्वीच या पुस्तकाने राजकारणात धुराळा उडवून दिला आहे. या पुस्तकाने एकाहून एक दावे, प्रतिदावे, गौप्यस्फोट बाहेर येत आहे. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता राऊत यांनी पत्र परिषदेत आरोपांची पुन्हा राळ उडवून दिली. इतकेच नाही तर त्यांनी अजून काही गौप्यस्फोट केले. त्यावरून नवीन वाद वाढण्याची शक्यता आहे. त्यातच त्यांनी पंतप्रधानांविषयीचा एक मोठा दावा केला आहे.

तुम्ही देशाचा पंतप्रधान नियुक्त करताय

यावेळी संजय राऊत यांनी मोदी यांच्या पंतप्रधान होण्यामागील एक किस्सा सांगितला. “नेस्को ग्राऊंडच्या कार्यक्रमानंतर मोदी गुजरात मुख्यमंत्री झाले होते. तेव्हा मीच होतो तिथे. आताचे भाजपचे लोक नव्हते. मोदी, बाळासाहेब आणि संजय राऊत असा फोटो आहे. पुरावे खूप आहेत. उद्धव ठाकरेंनी मोदींना पंतप्रधानपदासाठी पाठिंब्याचं पत्र देत असताना मी गंमतीने काढलेला व्हिडिओ आहे. तोही उपलब्ध आहे. आताची पोरंढोरं तेव्हा नव्हती. हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून आले आहेत. यांना काय माहीत भाजप आणि शिवसेनेचे काय संबंध होते ते. मी गंमतीने उद्धव ठाकरेंना म्हणालो होते, उद्धवजी तुम्ही देशाचे पंतप्रधान नियुक्त करताय बरं का. उद्धवजी म्हणाले, हो हो, अरे बाबा नरेंद्र भाईंना आपण कधी तरी सांगायला पाहिजे मी अशी अशी सही केली तुमच्या पत्रावर” अशी माहिती राऊतांनी आज झालेल्या पत्र परिषदेत दिली.

शाह आल्यापासून सेना-भाजपात दरी

शिवसेना आणि भाजपात सलोख्याचे संबंध होते. पण अमित शाह हे जसे दिल्लीत आले, तेव्हापासून शिवसेना आणि भाजपामध्ये दरी वाढल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. यापूर्वी सुद्धा राऊतांनी युती तुटण्यामागे अमित शाह असल्याचा आरोप केला होता. राऊत सातत्याने शाह यांच्यावर आरोप करत आहे. आताही त्यांनी शाह यांना आपण फोन करून आपल्याला अटक करा असे सांगितल्याची माहिती दिली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.