AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : शरद पवार यांचं सर्वात मोठं राजकीय भाष्य; राज्यात लोकसभेची पुनरावृत्ती? कारण तरी काय

Sharad Pawar on Vidhansabha Election 2024 : राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महायुती सरकावर कोरडे ओढतानाच विधानसभेचे चित्र पण स्पष्ट केले. शरद पवार यांनी राज्यात लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा दावा त्यांनी केला. त्यामागील कारण पण त्यांनी स्पष्ट केले आहे. काय म्हणाले शरद पवार?

Sharad Pawar : शरद पवार यांचं सर्वात मोठं राजकीय भाष्य; राज्यात लोकसभेची पुनरावृत्ती? कारण तरी काय
शरद पवार यांचे मोठं राजकीय भाष्य
| Updated on: Oct 13, 2024 | 2:21 PM
Share

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भाकि‍तांकडे सर्वांचेच लक्ष्य असते. यापूर्वी त्यांनी लोकसभेला महाविकास आघाडी मोठ्या फरकाने जिंकेल असं भाकित केलं होतं. निकालानंतरचं चित्र राज्यासमोर आहे. आता ही त्यांनी लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज वर्तवला आहे. पवार यांनी महायुतीवर कोरडे ओढले आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मोठी मुसंडी मारण्याचा दावा केला. काय म्हणाले शरद पवार?

लोकांना बदल हवा

मी सतत महाराष्ट्रात हिंडतोय. इतर सहकारी फिरत आहे. माझं निरीक्षण असं आहे की लोकांना परिवर्तन हवं आहे. लोकसभेच्या निकालाआधी कोणी मान्य करत नव्हतं. पण निकाल आला. आम्ही ३१ जागा जिंकलो याचा अर्थ लोकांना बदल हवा होता. आताही विधानसभेत हा बदल होणार हे नक्की आहे, असा दावा त्यांनी केला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहऱ्याबाबत उत्तर दिलं. उत्तर दिलं तेच आमचं उत्तर आहे.

हा तर निवडणुकीचा उद्योग

महिलांचा सन्मान करायचं ठरवलं तर आम्ही त्याचं समर्थन करतो. फक्त ही योजना कायमची आहे की तात्पुरती आहे. हे सांगावं. बजेट मांडला जातो. त्यातील एकही तरतूद बजेटमध्ये नाही. हा निवडणुकीसाठीचा उद्योग आहे, अशी टीका शरद पवार यांनी केली. ही एक प्रकारे भगिनींची फसवणूक करण्याचं पाऊल आहे.

लाडकी बहिणीचं स्वरुप, त्याचा अभ्यास करावा लागेल. बजेटची तरतूद याची माहिती घ्यावी लागेल. जर योग्य असेल तर चालू ठेवायला हरकत नाही. पण ती तात्पुरती होणार नाही याची खात्री आमची झाली पाहिजे. ज्यांना लाभ होणार आहे, त्यांनाही वाटली पाहिजे, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडीला आगामी विधानसभा निवडणुकीत मोठी आघाडी मिळण्याचा विश्वास शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. दसरा मेळाव्यात सुद्धा उद्धव ठाकरे यांनी दोन महिने थांबा, आमचे सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे महायुतीला आता वातावरण बदलल्याचा मोठा फायदा होईल असे वाटत आहे. लोकसभेचा कलंक पुसणार असल्याचा दावा महायुतीकडून करण्यात येत आहे.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...