AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udhav Thackeray : फडणवीसांना मित्र म्हणून सांगतो… माझा सल्ला आहे… टोमणा नाही… उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले?

Udhav Thackeray on Fadnavis : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सल्ला दिला आहे. त्यांनी फडणवीस सरकारमधील मंत्र्यांच्या वादाबाबत चिंता व्यक्त केली आणि त्यांना राज्यातील भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे. ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या भवितव्याबाबत आशा व्यक्त केली आणि समाजातील भेदाभेद नष्ट करण्याचे आवाहन केले.

Udhav Thackeray : फडणवीसांना मित्र म्हणून सांगतो... माझा सल्ला आहे... टोमणा नाही... उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले?
उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सल्ला
| Updated on: Jul 20, 2025 | 10:58 AM
Share

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सल्ला दिला आहे. हा सल्ला देताना मी त्यांना टोमणा लगावत नाहीये, असा चिमटाही त्यांनी काढला आहे. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांचा उल्लेख कधीकाळचे राजकीय मित्र असा उल्लेख केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीत अंतर झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.

खासदार संजय राऊत यांनी समारोपाच्या या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतचा सवाल केला. त्यावर उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांना मित्र म्हणून एक सल्ला दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याशी अलिकडे तुमची चर्चा झालीय का? असा सवाल राऊत यांनी केला. त्यावर, आता तरी चर्चा झाली नाही. सुरुवातीला जाऊन त्यांना गुच्छ दिला होता. आहेत आता मुख्यमंत्री. मानो या ना मानो. तुमच्याकडून चांगलं व्हावं ही अपेक्षा आजही आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

बदनाम फडणवीस होत आहेत…

उलटं माझं म्हणणं आहे, त्यांच्या सहकारी मंत्र्यांच्या भानगडी , लफडी आणि कुलंगडी बाहेर येत आहेत, त्या त्यांनी मोडीत काढल्या पाहिजे. हे मी त्यांना आमचे कधीकाळीचे राजकीय मित्र म्हणून सांगतो. त्यांनी हे माझं मत… हा टोमणा नाही… हा सल्ला आहे. टोमणा नाही आधीच सांगतो. त्यांनी मंत्र्यांच्या भानगडी मोडीत काढल्या पाहिजे. नीती वगैरे या गोष्टी पाळत असतील तर हे जे काही आजूबाजूला चाललं आहे… त्यांच्या प्रतिमेला तडा देणारं काम आहे. काल बॅग दिसली, जमीन दिली जाते, 3 हजार कोटीची चोरी सुप्रीम कोर्ट पकडून देते. हे सर्व चालले आहे. पण राज्याचे प्रमुख म्हणून शेवटी बदनाम फडणवीस होत आहेत. त्यांच्या अधिपत्याखाली हा भ्रष्टाचार सुरू आहे. दिव्याखाली अंधार तसा हा प्रकार आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

जागे व्हा आणि जागे राहा

महाराष्ट्राला भविष्य आहे का? असा सवालही त्यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी होय असं म्हटलं. भविष्य नक्कीच आहे. खचून कसं चालेल? लोकसभेला महाराष्ट्र जागा झाला होता, तसा तो परत जागा झाला पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व उद्योग गुजरातला नेले, मराठी माणूस बाहेर काढला जातो, आता नाही जाग आली तर आपले डोळे कधीच उघडले जाणार नाही. जागे व्हा आणि जागे राहा. कुणावर अन्याय करू नका. पण कुणी अन्याय केला तर सहन करू नका. भेदाभेद गाडून एकत्र या, असं आवाहन त्यांनी केलं.

हे राजकारण हाणून पाडा

मराठा समाजाला भडकवलं जातं. भाजपची एक नीती आहे, राज्यातील सर्वात मोठ्या समाजाला भडकवायचं. तो पेटला तर त्या समाजाच्या व्यतिरिक्त इतर समाज आहेत, त्यांना चिथवायचं. जसं त्यांनी गुजरातमध्ये केलं. पटेलांना भडकवलं आणि पटेलांच्या व्यतिरिक्त इतरांना चिथवून एकत्र आणून सत्ता घेतली. हरियाणात जाट समाजाला भडकवलं. भाजप सत्तेतून गेलीच असं चित्र हरयाणात होतं. जाट तिरीमिरीने उभा राहिला आणि इतरांना जाटांची भीती दाखवून, एकवटून भाजपने सत्ता आणली. महाराष्ट्रात बटेंगे तो कटेंगे केलं. आपल्याला वाटलं हिंदू-मुस्लिम. पण त्यांनी मराठा आणि मराठेत्तर केलं. त्यांच्या विरोधात ओबीसी उभा केला. सत्ता आणली. मराठी भावंडांमध्येच समाजाच्या भिंती उभ्या करून पोळी भाजायची हे राजकारण हाणून पाडा, असंही ते म्हणाले.

Follow Us
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.