AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

43 वर्षांपूर्वीचा ब्लॉकबस्टर, अमिताभ बच्चन यांच्यामुळे बदलेला चित्रपटाचा शेवट, अनेक वर्षानंतर समोर आलं कारण

अमिताभ बच्चन यांच्या ‘कुली’ चित्रपटाचा क्लायमॅक्स का बदलला? 43 वर्षांनंतर समोर आला रंजक किस्सा. नेमकं काय घडलेलं?

| Updated on: May 31, 2026 | 1:27 PM
Share
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'कुली' या चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. तब्बल 43 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या मूळ कथेनुसार अमिताभ बच्चन यांच्या पात्राचा शेवटी मृत्यू होणार होता.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेल्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'कुली' या चित्रपटाशी संबंधित एक रंजक किस्सा पुन्हा चर्चेत आला आहे. तब्बल 43 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या मूळ कथेनुसार अमिताभ बच्चन यांच्या पात्राचा शेवटी मृत्यू होणार होता.

1 / 5
मात्र, एका गंभीर अपघातानंतर दिग्दर्शकांनी चित्रपटाचा क्लायमॅक्सच बदलण्याचा निर्णय घेतला. 'कुली'च्या शूटिंगदरम्यान अभिनेता पुनीत इस्सार यांच्यासोबतच्या एका अॅक्शन दृश्यात अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते. या अपघातात त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती आणि अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

मात्र, एका गंभीर अपघातानंतर दिग्दर्शकांनी चित्रपटाचा क्लायमॅक्सच बदलण्याचा निर्णय घेतला. 'कुली'च्या शूटिंगदरम्यान अभिनेता पुनीत इस्सार यांच्यासोबतच्या एका अॅक्शन दृश्यात अमिताभ बच्चन गंभीर जखमी झाले होते. या अपघातात त्यांच्या पोटाला गंभीर दुखापत झाली होती आणि अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

2 / 5
त्या काळात त्यांच्या प्रकृतीबाबत संपूर्ण देश चिंतेत होता. लाखो चाहत्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या होत्या. अपघातापूर्वी चित्रपटाच्या कथेनुसार खलनायकाची गोळी लागून अमिताभ यांनी साकारलेले 'इक्बाल' हे पात्र मृत्युमुखी पडणार होते. त्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेवर आधारित 'सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं' या गाण्याची भावनिक आवृत्ती दाखवण्याची योजना होती.

त्या काळात त्यांच्या प्रकृतीबाबत संपूर्ण देश चिंतेत होता. लाखो चाहत्यांनी त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केल्या होत्या. अपघातापूर्वी चित्रपटाच्या कथेनुसार खलनायकाची गोळी लागून अमिताभ यांनी साकारलेले 'इक्बाल' हे पात्र मृत्युमुखी पडणार होते. त्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेवर आधारित 'सारी दुनिया का बोझ हम उठाते हैं' या गाण्याची भावनिक आवृत्ती दाखवण्याची योजना होती.

3 / 5
मात्र, अमिताभ बच्चन मृत्यूच्या दारातून परतल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. वास्तविक आयुष्यात मृत्यूशी झुंज देऊन परतलेल्या अमिताभ यांना पडद्यावर मारणे योग्य ठरणार नाही तसेच चाहत्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात असे त्यांना वाटले. त्यामुळे चित्रपटाचा शेवट बदलण्यात आला आणि अमिताभ यांचे पात्र जिवंत ठेवण्यात आले.

मात्र, अमिताभ बच्चन मृत्यूच्या दारातून परतल्यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला. वास्तविक आयुष्यात मृत्यूशी झुंज देऊन परतलेल्या अमिताभ यांना पडद्यावर मारणे योग्य ठरणार नाही तसेच चाहत्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात असे त्यांना वाटले. त्यामुळे चित्रपटाचा शेवट बदलण्यात आला आणि अमिताभ यांचे पात्र जिवंत ठेवण्यात आले.

4 / 5
1983 मध्ये प्रदर्शित झालेला 'कुली' चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. चित्रपटाने त्या काळात सुमारे 18 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जाते. अमिताभ बच्चन यांना पुन्हा पडद्यावर पाहून अनेक प्रेक्षक भावूक झाले होते.

1983 मध्ये प्रदर्शित झालेला 'कुली' चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला. चित्रपटाने त्या काळात सुमारे 18 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जाते. अमिताभ बच्चन यांना पुन्हा पडद्यावर पाहून अनेक प्रेक्षक भावूक झाले होते.

5 / 5
Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा