AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केरळनंतर आता दिल्लीचं नाव बदलणार? थेट अमित शाहांकडे…सर्वात मोठी अपडेट समोर!

केंद्र सरकारने केरळ या राज्याचे नाव बदलून केरलम असे केले आहे. त्यानंतर आता थेट राजधानी दिल्लीचेही नाव बदलण्याची मागणी केली जात आहे. याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

| Updated on: Feb 26, 2026 | 6:33 PM
Share
केंद्र सरकारने केरळ या राज्याचे नाव बदलून केरलम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हे नाव बदलण्याबाबतचा प्रस्तावर खुद्द केरळच्याच सरकारने केंद्राकडे पाठवला होता. आता केरळ हे राज्या यापुढे केरलम या नावाने ओळखले जाणार आहे.

केंद्र सरकारने केरळ या राज्याचे नाव बदलून केरलम करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हे नाव बदलण्याबाबतचा प्रस्तावर खुद्द केरळच्याच सरकारने केंद्राकडे पाठवला होता. आता केरळ हे राज्या यापुढे केरलम या नावाने ओळखले जाणार आहे.

1 / 5
दरम्यान, केरळ राज्याचे नाव बदलल्यानंतर आता आणखी एक मोठी मागणी समोर येत आहे. भाजपाचे नेते तथा खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी थेट राजधानी दिल्लीचे नाव बदलावे अशी मोठी मागणी केली आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, केरळ राज्याचे नाव बदलल्यानंतर आता आणखी एक मोठी मागणी समोर येत आहे. भाजपाचे नेते तथा खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी थेट राजधानी दिल्लीचे नाव बदलावे अशी मोठी मागणी केली आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

2 / 5
खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी राजधानी दिल्लीचे नाव 'इंद्रप्रस्थ' असे करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दिल्ली हे नाव मध्यकालीन तसेच वसाहतवादी कालखंडाचे आहे. तर इंद्रप्रस्थ या नावातून प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडते, असे खंडेलवाल म्हणाले.

खंडेलवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी राजधानी दिल्लीचे नाव 'इंद्रप्रस्थ' असे करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. दिल्ली हे नाव मध्यकालीन तसेच वसाहतवादी कालखंडाचे आहे. तर इंद्रप्रस्थ या नावातून प्राचीन संस्कृतीचे दर्शन घडते, असे खंडेलवाल म्हणाले.

3 / 5
 दिल्ली हे नेहमी राजधानीचे शहर राहिलेले आहे. त्यामुळे या शहरावर नेहमीच वेगवेगळ्या राजा-महाराजांनी हल्ले केलेले आहेत. या हल्ल्यांमध्ये दिल्ली शहर अनेकदा उद्ध्वस्त झालेले आहे. परंतु नव्याने हे शहर उभे राहिलेले आहे. इतिहासातील नोंदीप्रमाणे दिल्ली हे शहर इतरही काही नावांनी ओळखले जायचे.

दिल्ली हे नेहमी राजधानीचे शहर राहिलेले आहे. त्यामुळे या शहरावर नेहमीच वेगवेगळ्या राजा-महाराजांनी हल्ले केलेले आहेत. या हल्ल्यांमध्ये दिल्ली शहर अनेकदा उद्ध्वस्त झालेले आहे. परंतु नव्याने हे शहर उभे राहिलेले आहे. इतिहासातील नोंदीप्रमाणे दिल्ली हे शहर इतरही काही नावांनी ओळखले जायचे.

4 / 5
याआधी दिल्ली शहराला दिल्लिका, दहली, तुघलकाबाद, शाहजहानाबाद, नवी दिल्ली या नावांनी ओळखले जायचे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे शहर दिल्ली नावाने ओळखले जाते. याआधीही भारतात कलकत्ता या शहराचे नाव बदलून कोलकाता, इलाहाबादचे प्रयागराज, मद्रासचे चेन्नई, बॉम्बेचे मुंबई असे नामकरण झालेले आहे. त्यामुळे दिल्ली शहराचे नावही भविष्यात बदलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

याआधी दिल्ली शहराला दिल्लिका, दहली, तुघलकाबाद, शाहजहानाबाद, नवी दिल्ली या नावांनी ओळखले जायचे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हे शहर दिल्ली नावाने ओळखले जाते. याआधीही भारतात कलकत्ता या शहराचे नाव बदलून कोलकाता, इलाहाबादचे प्रयागराज, मद्रासचे चेन्नई, बॉम्बेचे मुंबई असे नामकरण झालेले आहे. त्यामुळे दिल्ली शहराचे नावही भविष्यात बदलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

5 / 5
Follow Us
अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीने पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती
अजित पवार अपघात प्रकरणी सीआयडीने पत्रकार परिषद घेत दिली मोठी माहिती.
अपघातात गुन्हेगारी कृत्य घडलं का? याचा तपास सुरु; सीआयडीची माहिती
अपघातात गुन्हेगारी कृत्य घडलं का? याचा तपास सुरु; सीआयडीची माहिती.
चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; नेमकं काय घडलं?
चोरीची ट्रॅव्हल्स शिरोली टोल नाक्यावर आदळली; नेमकं काय घडलं?.
चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आज मुंबई-आग्रा महामार्गावर....
चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण; आज मुंबई-आग्रा महामार्गावर.....
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान....
अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान.....
मराठीचं गुजरातीकरण करता कामा नये; संजय गायकवाड यांचा सरकारला घरचा आहेर
मराठीचं गुजरातीकरण करता कामा नये; संजय गायकवाड यांचा सरकारला घरचा आहेर.
यामागे कुणातरी मोठ्या व्यक्तीचा हात! रोहित पवारांचा गंभीर आरोप
यामागे कुणातरी मोठ्या व्यक्तीचा हात! रोहित पवारांचा गंभीर आरोप.
राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत सचिन आहिर यांचा खुलासा; शरद पवार लढणार?
राज्यसभेच्या रिक्त जागेबाबत सचिन आहिर यांचा खुलासा; शरद पवार लढणार?.
विरोध शिंदेंच्या सेनेचा नाही, भाजपचा! रोहित पवार स्पष्टच बोलले
विरोध शिंदेंच्या सेनेचा नाही, भाजपचा! रोहित पवार स्पष्टच बोलले.
मुंबईसह बारामतीतही पोलिसांवर दबाव? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
मुंबईसह बारामतीतही पोलिसांवर दबाव? रोहित पवारांचा खळबळजनक दावा.