AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रात्रभर मिथुन आणि श्रीदेवी… अभिनेत्याचा मोठा खुलासा, त्या रात्री नेमकं काय घडलं होतं?

श्रीदेवी आणि मिथुन चक्रवर्ती यांच्याबद्दल असे म्हटले जाते की दोघांनी कथितपणे गुपचुप पद्धतीने लग्न केले होते. पण दोघांनीही कधीही त्यांच्या नात्याबद्दल काही सांगितले नाही. आता एक अभिनेते आणि दिग्दर्शकाने श्रीदेवी व मिथुन यांच्या नात्याबाबत खुलासा केला आहे.

| Updated on: Oct 30, 2025 | 12:24 PM
Share
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री मानले जाते. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबतच श्रीदेवी यांनी आपल्या सौंदर्याने आणि नृत्यानेही भरपूर वाहवा मिळवली.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम अभिनेत्री मानले जाते. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. आपल्या उत्कृष्ट अभिनयासोबतच श्रीदेवी यांनी आपल्या सौंदर्याने आणि नृत्यानेही भरपूर वाहवा मिळवली.

1 / 5
श्रीदेवी या त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत राहिल्या आहेत. त्यांच्यामागे अनेक सुपरस्टार्स वेडे होते. पण शेवटी त्यांनी निर्माते बोनी कपूर यांच्याशी लग्न केले. पण असे म्हटले जाते की याआधी श्रीदेवी यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्याशी गुपचुप लग्न केले होते. दोघांच्या नात्याबद्दल विविध चर्चा होत राहिल्या. मात्र आता कित्येक वर्षानंतर दिग्दर्शक आणि अभिनेते करण राजदान यांनी श्रीदेवी आणि मिथुन यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की मिथुन आणि श्रीदेवी रात्रंदिवस भांडत असत.

श्रीदेवी या त्यांच्या खासगी आयुष्यामुळेही कायमच चर्चेत राहिल्या आहेत. त्यांच्यामागे अनेक सुपरस्टार्स वेडे होते. पण शेवटी त्यांनी निर्माते बोनी कपूर यांच्याशी लग्न केले. पण असे म्हटले जाते की याआधी श्रीदेवी यांनी मिथुन चक्रवर्ती यांच्याशी गुपचुप लग्न केले होते. दोघांच्या नात्याबद्दल विविध चर्चा होत राहिल्या. मात्र आता कित्येक वर्षानंतर दिग्दर्शक आणि अभिनेते करण राजदान यांनी श्रीदेवी आणि मिथुन यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की मिथुन आणि श्रीदेवी रात्रंदिवस भांडत असत.

2 / 5
श्रीदेवी आणि मिथुन यांच्याबद्दल करण यांच्या खुलाशामुळे सर्वजण थक्क झाले. करण राजदान यांनी नुकतेच सिद्धार्थ कन्ननशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “ते संपूर्ण रात्र भांडत असत. आता ती (श्रीदेवी) या जगात नाही, म्हणून मी त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही.”

श्रीदेवी आणि मिथुन यांच्याबद्दल करण यांच्या खुलाशामुळे सर्वजण थक्क झाले. करण राजदान यांनी नुकतेच सिद्धार्थ कन्ननशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले, “ते संपूर्ण रात्र भांडत असत. आता ती (श्रीदेवी) या जगात नाही, म्हणून मी त्यांच्याबद्दल जास्त बोलणार नाही.”

3 / 5
करण यांनी पुढे मिथुन चक्रवर्ती यांची स्तुती करताना त्यांना स्वच्छ मनाचा आणि अत्यंत भावनिक माणूस म्हटले. करण यांनी मिथुन यांच्यासोबत ‘डिस्को डांसर’ आणि ‘कसम पैदा करने वाले की’ सारख्या चित्रपटांमध्ये अभिनेते म्हणून काम केले आहे. त्यांना विचारले की मिथुन संपूर्ण रात्र भांडण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सेटवर कसे पोहोचत असत? यावर करण म्हणाले, “मिथुन दा यांच्यात जी ऊर्जा आहे ती दुसऱ्या कोणातही नाही. ते संपूर्ण रात्र जागून, फोनवर भांडण करूनही दुसऱ्या दिवशी आपल्या नृत्याच्या सराव करायचे आणि सेटवर वेळेवर पोहोचू शकतात. ते खूप भावनिक आहेत आणि त्यांचे मन खूप स्वच्छ आहे.”

करण यांनी पुढे मिथुन चक्रवर्ती यांची स्तुती करताना त्यांना स्वच्छ मनाचा आणि अत्यंत भावनिक माणूस म्हटले. करण यांनी मिथुन यांच्यासोबत ‘डिस्को डांसर’ आणि ‘कसम पैदा करने वाले की’ सारख्या चित्रपटांमध्ये अभिनेते म्हणून काम केले आहे. त्यांना विचारले की मिथुन संपूर्ण रात्र भांडण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सेटवर कसे पोहोचत असत? यावर करण म्हणाले, “मिथुन दा यांच्यात जी ऊर्जा आहे ती दुसऱ्या कोणातही नाही. ते संपूर्ण रात्र जागून, फोनवर भांडण करूनही दुसऱ्या दिवशी आपल्या नृत्याच्या सराव करायचे आणि सेटवर वेळेवर पोहोचू शकतात. ते खूप भावनिक आहेत आणि त्यांचे मन खूप स्वच्छ आहे.”

4 / 5
८० च्या दशकात मिथुन आणि श्रीदेवी यांच्याबद्दल बातम्या होत्या की दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर गुपचुप लग्न केले होते. पण मिथुन आधीच विवाहित होते. त्यांनी योगिता बाली यांच्याशी लग्न केले होते. असे सांगितले जाते की मिथुन योगिता यांना सोडण्यास तयार नव्हते. अशा परिस्थितीत श्रीदेवी आणि मिथुन यांचे नाते तुटणारच होते. मात्र दोघांपैकी कोणानेही त्यांच्या नात्याबद्दल कधीही काही सांगितले नव्हते. वर्षानंतर श्रीदेवी यांनी १९९६ मध्ये बोनी कपूर यांच्याशी लग्न केले होते.

८० च्या दशकात मिथुन आणि श्रीदेवी यांच्याबद्दल बातम्या होत्या की दोघांनी एकमेकांना डेट केल्यानंतर गुपचुप लग्न केले होते. पण मिथुन आधीच विवाहित होते. त्यांनी योगिता बाली यांच्याशी लग्न केले होते. असे सांगितले जाते की मिथुन योगिता यांना सोडण्यास तयार नव्हते. अशा परिस्थितीत श्रीदेवी आणि मिथुन यांचे नाते तुटणारच होते. मात्र दोघांपैकी कोणानेही त्यांच्या नात्याबद्दल कधीही काही सांगितले नव्हते. वर्षानंतर श्रीदेवी यांनी १९९६ मध्ये बोनी कपूर यांच्याशी लग्न केले होते.

5 / 5
Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.