AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संध्याकाळी कापूर जाळणे शुभ आहे की अशुभ? 99 टक्के लोकांना माहिती नाही परिणाम

घरात संध्याकाळी कापूर जाळण्याचे सविस्तर फायदे जाणून घ्या. वास्तुदोष निवारण, कर्जमुक्ती, मानसिक शांती आणि माता लक्ष्मीच्या आशीर्वादासाठी कापूर जाळणे कसे फायदेशीर ठरते, याची संपूर्ण माहिती येथे वाचा.

| Updated on: Jan 26, 2026 | 12:51 PM
Share
भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्मात कापूर (Camphor) केवळ एक पूजेचे साहित्य नसून ते सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. 'कर्पूरगौरं करुणावतारं...' या मंत्रावरूनच आपल्याला कापूरला देवकार्यात किती महत्त्व आहे हे समजते.

भारतीय संस्कृतीत आणि हिंदू धर्मात कापूर (Camphor) केवळ एक पूजेचे साहित्य नसून ते सकारात्मकतेचे प्रतीक मानले जाते. 'कर्पूरगौरं करुणावतारं...' या मंत्रावरूनच आपल्याला कापूरला देवकार्यात किती महत्त्व आहे हे समजते.

1 / 8
अनेक घरांमध्ये सकाळी पूजा करताना कापूर जाळला जातो. परंतु शास्त्रानुसार संध्याकाळी कापूर जाळण्याचे विशेष महत्त्व आणि फायदे सांगण्यात आले आहेत.

अनेक घरांमध्ये सकाळी पूजा करताना कापूर जाळला जातो. परंतु शास्त्रानुसार संध्याकाळी कापूर जाळण्याचे विशेष महत्त्व आणि फायदे सांगण्यात आले आहेत.

2 / 8
संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते. ज्या घरात संध्याकाळी कापूर जाळला जातो आणि त्याचा सुगंध दरवळतो, तिथे माता लक्ष्मी आकर्षित होते.

संध्याकाळची वेळ ही लक्ष्मी येण्याची वेळ मानली जाते. ज्या घरात संध्याकाळी कापूर जाळला जातो आणि त्याचा सुगंध दरवळतो, तिथे माता लक्ष्मी आकर्षित होते.

3 / 8
शुद्ध आणि पवित्र वातावरणात देवी लक्ष्मीचा वास असतो, ज्यामुळे घरातील आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात. अनेकदा घराची रचना वास्तुशास्त्रानुसार नसल्यास घरात कलह किंवा प्रगतीत अडथळे येतात.

शुद्ध आणि पवित्र वातावरणात देवी लक्ष्मीचा वास असतो, ज्यामुळे घरातील आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतात. अनेकदा घराची रचना वास्तुशास्त्रानुसार नसल्यास घरात कलह किंवा प्रगतीत अडथळे येतात.

4 / 8
दररोज संध्याकाळी एका पितळी किंवा मातीच्या पात्रात कापूर जाळून तो संपूर्ण घरात फिरवल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात. कापूरच्या धुरामुळे वातावरणातील जंतू नष्ट होतात. तसेच नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून सकारात्मक लहरी निर्माण होतात.

दररोज संध्याकाळी एका पितळी किंवा मातीच्या पात्रात कापूर जाळून तो संपूर्ण घरात फिरवल्याने घरातील वास्तुदोष कमी होतात. कापूरच्या धुरामुळे वातावरणातील जंतू नष्ट होतात. तसेच नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून सकारात्मक लहरी निर्माण होतात.

5 / 8
आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक तणाव वाढला आहे. संध्याकाळी कामावरून घरी परतल्यानंतर जर घरातील वातावरण प्रसन्न नसेल, तर चिडचिड वाढते. कापूरचा सुवास मेंदूला शांत करण्याचे काम करतो. यामुळे घरातील सदस्यांचे मन प्रसन्न राहते. तसेच नैराश्याची भावना कमी होण्यास मदत होते.

आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक तणाव वाढला आहे. संध्याकाळी कामावरून घरी परतल्यानंतर जर घरातील वातावरण प्रसन्न नसेल, तर चिडचिड वाढते. कापूरचा सुवास मेंदूला शांत करण्याचे काम करतो. यामुळे घरातील सदस्यांचे मन प्रसन्न राहते. तसेच नैराश्याची भावना कमी होण्यास मदत होते.

6 / 8
जर तुम्ही दीर्घकाळापासून कर्जाच्या विळख्यात अडकला असाल, तर शास्त्रानुसार संध्याकाळी कापूर जाळणे हा एक प्रभावी उपाय मानला जातो. यामुळे देवतांचे आशीर्वाद मिळतात. तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात, असे मानले जाते.

जर तुम्ही दीर्घकाळापासून कर्जाच्या विळख्यात अडकला असाल, तर शास्त्रानुसार संध्याकाळी कापूर जाळणे हा एक प्रभावी उपाय मानला जातो. यामुळे देवतांचे आशीर्वाद मिळतात. तसेच उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतात, असे मानले जाते.

7 / 8
केवळ धार्मिकच नव्हे, तर विज्ञानाच्या दृष्टीनेही कापूर महत्त्वाचा आहे. कापूर जाळल्याने हवेतील बॅक्टेरिया आणि हानिकारक विषाणू नष्ट होतात. विशेषतः पावसाळ्यात किंवा संध्याकाळी डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कापूर जाळणे हा एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय आहे.

केवळ धार्मिकच नव्हे, तर विज्ञानाच्या दृष्टीनेही कापूर महत्त्वाचा आहे. कापूर जाळल्याने हवेतील बॅक्टेरिया आणि हानिकारक विषाणू नष्ट होतात. विशेषतः पावसाळ्यात किंवा संध्याकाळी डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कापूर जाळणे हा एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी पर्याय आहे.

8 / 8
Follow Us
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा
मोदी बागेत पवार कुटुंब एकत्र, स्नेहभोजनाचा कार्यक्रम; सुनेत्रा पवार जा.
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून
मोठी बातमी! शिंदेंच्या कार्यकाळात सुरु केलेलं प्रकल्प पंकजा मुंडेंकडून.
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु
कलिंगड प्रकरणात सस्पेन्स, बिर्याणीने मृत्यू नाही? तपास सुरु.
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत
मंत्रालयातील पाणी प्यायल्याने कर्मचाऱ्यांंना उलट्या, पाण्याच्या टाकीत.
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद....
विदर्भात उष्णतेचा कहर; गडचिरोलीत ४२°C पार, गडचिरोली-हैदराबाद.....
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता
केईएम हॉस्पिटलच्या नामांतराला प्रशासनाकडून हिरवा कंदील? पालिका आयुक्ता.
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद.....
उद्धव ठाकरे मोठे नेते नाहीत; संजय निरुपमांचा टोला, विधान परिषद......
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला
मोठी अपडेट! अजित दादांच्या अपघाताच्या दिवशी ९ कोटी विमान कंपनी मालकाला.
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना....
मराठी सक्तीवर सरकारचा मवाळ पवित्रा; रिक्षा-टॅक्सी चालकांना.....
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल
चक्क मुंबईत पहलगामसारखी घटना! तू हिंदु आहेस? तु नमाज पठण करतोस? विचारल.