AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गावातील नळ बनले शोभेची वस्तू, उपसरपंचाचे पाण्यासाठी अनोखे आंदोलन, अधिकाऱ्यांसह प्रशासनाची उडाली एकच धांदल

water Crisis : गेल्या 22 वर्षांपासून गावातील पाणी पुरवठा योजनेचा बोजवारा वाजलेला. प्रयत्न करुनही अधिकारी वर्ग कोणतीही मदत करत नसल्याने मग उपसरपंचाने अनोखे आंदोलन केले. त्याची आता राज्यभर चर्चा होत आहे. तर अधिकाऱ्यांसह प्रशासनाची धांदल उडाली आहे.

| Updated on: Aug 27, 2025 | 1:31 PM
Share
भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील परसवाडा (देव्हाडी) येथे 22 वर्षांपासून बंद असलेली नळ पाणीपुरवठा योजना नावालाच आहे. भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना हाल सोसावे लागत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील परसवाडा (देव्हाडी) येथे 22 वर्षांपासून बंद असलेली नळ पाणीपुरवठा योजना नावालाच आहे. भर पावसाळ्यातही पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांना हाल सोसावे लागत आहेत. अनेक वेळा तक्रारी करूनही शासन व प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले.

1 / 6
गेल्या 22 वर्षापासून आमच्या गावात पाण्याच्या ढोला आणि प्रत्येक घरापर्यंत पाईपलाईन केली आहे. पण ते निरर्थक ठरत असून आम्हाला दोन- दोन किलोमीटरवर पिण्याचे पाणी आणण्याकरिता जावे लागते. असल्याची खंत येथील स्थानिक महिलांनी व्यक्त केली.

गेल्या 22 वर्षापासून आमच्या गावात पाण्याच्या ढोला आणि प्रत्येक घरापर्यंत पाईपलाईन केली आहे. पण ते निरर्थक ठरत असून आम्हाला दोन- दोन किलोमीटरवर पिण्याचे पाणी आणण्याकरिता जावे लागते. असल्याची खंत येथील स्थानिक महिलांनी व्यक्त केली.

2 / 6
 शासनाकडे निधी नसल्याचे कारण देत योजना बंद ठेवण्यात आल्याचे कारण समोर येत होते. या योजनेसाठी पैसाच नसल्याचे कारण वारंवार देण्यात येत होते. गावकरी अर्ज फाटे करुन कंटाळले होते.

शासनाकडे निधी नसल्याचे कारण देत योजना बंद ठेवण्यात आल्याचे कारण समोर येत होते. या योजनेसाठी पैसाच नसल्याचे कारण वारंवार देण्यात येत होते. गावकरी अर्ज फाटे करुन कंटाळले होते.

3 / 6
 या परिस्थितीला कंटाळून गावाचे उपसरपंच पवन खवास यांनी अनोखे आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाने अधिकाऱ्यांसह प्रशासनाची धावपळ उडाली. प्रशासनाच्या या निगरगठ्ठेपणाविरोधात त्यांनी आंदोलन केले.

या परिस्थितीला कंटाळून गावाचे उपसरपंच पवन खवास यांनी अनोखे आंदोलन केले. त्यांच्या आंदोलनाने अधिकाऱ्यांसह प्रशासनाची धावपळ उडाली. प्रशासनाच्या या निगरगठ्ठेपणाविरोधात त्यांनी आंदोलन केले.

4 / 6
खवास यांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती तसेच गावात भीक मागून पैसा जमा केला. तो थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना देत, “हे पैसे घ्या पण आमच्या गावाला पाणी द्या” अशी भावनिक विनंती केली.

खवास यांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती तसेच गावात भीक मागून पैसा जमा केला. तो थेट महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या अधिकाऱ्यांना देत, “हे पैसे घ्या पण आमच्या गावाला पाणी द्या” अशी भावनिक विनंती केली.

5 / 6
त्यांच्या या आंदोलनाची एकच चर्चा सुरू आहे. पण चर्चेपेक्षा गावाला पाणी महत्त्वाचे असल्याचे खवास म्हणाले. त्यांच्या या आंदोलनानंतर तरी गावात पाणी येणार का असा सवाल विचारण्यात येत आहे.

त्यांच्या या आंदोलनाची एकच चर्चा सुरू आहे. पण चर्चेपेक्षा गावाला पाणी महत्त्वाचे असल्याचे खवास म्हणाले. त्यांच्या या आंदोलनानंतर तरी गावात पाणी येणार का असा सवाल विचारण्यात येत आहे.

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.