AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘शुभविवाह’ मालिकेत मोठा ट्विस्ट; या लोकप्रिय अभिनेत्याची होणार एण्ट्री

'शुभविवाह' ही मालिका दुपारी 2 स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत यशोमन आपटे आणि मधुरा देशपांडे यांच्या मुख्य भूमिका आहेत. यासोबतच कुंजिका कालविंट, विशाखा सुभेदार, अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल देशपांडे, शीतल शुक्ला, विजय पटवर्धन यांच्याही भूमिका आहेत.

| Updated on: Jun 20, 2025 | 1:35 PM
Share
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'शुभविवाह' ही मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. आकाशच्या जीवघेण्या अपघातानंतर त्याचा जीव वाचवण्यासाठी भूमी शर्थीचे प्रयत्न करणार आहे. आकाशच्या उपचारांसाठी भारतातला नंबर वन न्युरो सर्जन संकर्षण अधिकारी देखिल येणार आहेत.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'शुभविवाह' ही मालिका सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. आकाशच्या जीवघेण्या अपघातानंतर त्याचा जीव वाचवण्यासाठी भूमी शर्थीचे प्रयत्न करणार आहे. आकाशच्या उपचारांसाठी भारतातला नंबर वन न्युरो सर्जन संकर्षण अधिकारी देखिल येणार आहेत.

1 / 6
डॉ. संकर्षण अधिकारी अत्यंत हुशार डॉक्टर असून आपल्या डॉक्टरी प्रोफेशनकडे प्रोफेशन म्हणून न बघता सेवा म्हणून बघतात. रुग्णांची सेवा हीच त्यांच्या आयुष्यातली पहिली प्रायॉरिटी आहे. सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मय उद्रिरकर डॉ. संकर्षण अधिकारीची भूमिका साकारणार आहे.

डॉ. संकर्षण अधिकारी अत्यंत हुशार डॉक्टर असून आपल्या डॉक्टरी प्रोफेशनकडे प्रोफेशन म्हणून न बघता सेवा म्हणून बघतात. रुग्णांची सेवा हीच त्यांच्या आयुष्यातली पहिली प्रायॉरिटी आहे. सुप्रसिद्ध अभिनेता चिन्मय उद्रिरकर डॉ. संकर्षण अधिकारीची भूमिका साकारणार आहे.

2 / 6
स्टार प्रवाहच्या 'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेमुळे चिन्मय घराघरात पोहोचला. जवळपास 11 वर्षांनंतर चिन्मय स्टार प्रवाहच्या मालिकेतून भेटीला येणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना चिन्मय म्हणाला, "स्टार प्रवाह वाहिनीमुळे मला नवी ओळख मिळाली आणि पुन्हा एकदा एका नव्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटण्याची संधी मिळणार आहे."

स्टार प्रवाहच्या 'स्वप्नांच्या पलिकडले' मालिकेमुळे चिन्मय घराघरात पोहोचला. जवळपास 11 वर्षांनंतर चिन्मय स्टार प्रवाहच्या मालिकेतून भेटीला येणार आहे. या भूमिकेविषयी सांगताना चिन्मय म्हणाला, "स्टार प्रवाह वाहिनीमुळे मला नवी ओळख मिळाली आणि पुन्हा एकदा एका नव्या व्यक्तिरेखेच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटण्याची संधी मिळणार आहे."

3 / 6
"या भूमिकेसाठी जेव्हा विचारणा झाली तेव्हा ऐकता क्षणीच ती मला आवडली आणि मी लगेच होकार दिला. अशा पद्धतीची भूमिका मी पहिल्यांदा साकारतोय. डॉ. संकर्षण हा स्वभावाने गंभीर आणि कमी व्यक्त होणारा आहे. अत्यंत शिस्तबद्ध आयुष्य जगणारा. आपण भलं आणि आपलं काम भलं या मताचा," असं त्याने सांगितलं.

"या भूमिकेसाठी जेव्हा विचारणा झाली तेव्हा ऐकता क्षणीच ती मला आवडली आणि मी लगेच होकार दिला. अशा पद्धतीची भूमिका मी पहिल्यांदा साकारतोय. डॉ. संकर्षण हा स्वभावाने गंभीर आणि कमी व्यक्त होणारा आहे. अत्यंत शिस्तबद्ध आयुष्य जगणारा. आपण भलं आणि आपलं काम भलं या मताचा," असं त्याने सांगितलं.

4 / 6
डॉ. संकर्षण हा आपल्या कुटुंबावर, बायको मुलांवर प्रचंड प्रेम करणारा आहे. पण त्याच्या या मताला, त्याच्या स्वभावाला आणि व्यक्तिमत्वाला तेव्हा धक्का बसतो जेव्हा त्याच्या बायकोचा अपघाती मृत्यू होतो. बायकोच्या अपघाती मृत्यूमुळे तो कोलमडून गेला आहे.

डॉ. संकर्षण हा आपल्या कुटुंबावर, बायको मुलांवर प्रचंड प्रेम करणारा आहे. पण त्याच्या या मताला, त्याच्या स्वभावाला आणि व्यक्तिमत्वाला तेव्हा धक्का बसतो जेव्हा त्याच्या बायकोचा अपघाती मृत्यू होतो. बायकोच्या अपघाती मृत्यूमुळे तो कोलमडून गेला आहे.

5 / 6
त्याचं आयुष्य बायकोपासून सुरु होऊन बायकोपाशी संपायचं. ती गेल्यामुळे तो आतून पुरत तुटलाय. त्याने जगणं सोडून दिलंय. येईल तो दिवस फक्त ढकलतो आहे. आकाशवर उपचार करण्यासाठी त्याने भूमीसमोर एक अट ठेवली आहे. ही अट नेमकी काय आहे? आकाशचा जीव वाचवण्यासाठी भूमी ही अट स्वीकारणार का? हे पाहंणं उत्सुकतेचं असेल.

त्याचं आयुष्य बायकोपासून सुरु होऊन बायकोपाशी संपायचं. ती गेल्यामुळे तो आतून पुरत तुटलाय. त्याने जगणं सोडून दिलंय. येईल तो दिवस फक्त ढकलतो आहे. आकाशवर उपचार करण्यासाठी त्याने भूमीसमोर एक अट ठेवली आहे. ही अट नेमकी काय आहे? आकाशचा जीव वाचवण्यासाठी भूमी ही अट स्वीकारणार का? हे पाहंणं उत्सुकतेचं असेल.

6 / 6
Follow Us
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
रत्नागिरीत अवकाळी पावसाचा आंब्यांना फटका, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान.
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
'कर्माचे फळ...,' चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया.
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.