AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery : वाढत्या उन्हामुळे विहिरींनी तळ गाठला, आता धरणातील पाण्याचा पिकांना आधार

पुणे : सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस आणि जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा असतानाही वाढत्या उन्हामुळे विहिरींनी तळ गाठला आहे. हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच अशी परस्थिती ओढावली आहे. असे असताना देखील शेतकऱ्यांना घाबरण्याचे कारण नाही. यंदा प्रथमच धरणातील पाण्याचा वापर हा शेती पिकांसाठी होत आहे. आतापर्यंत मराठवाड्यातील मांजरा, जायकवाडी प्रकल्पातील पाणी हे शेती पिकासाठी सोडण्यात आले होते. असाच निर्णय पुणे जिल्ह्यातही झाला आहे. येथील वडज धरणातून मीना नदीपात्रात उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून या आवर्तनाचा मीना आणि घोड नदीकाठच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. गरजेच्या वेळी पिकांना मिळाल्याने उत्पादनात वाढ होणार आहे.

| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Apr 10, 2022 | 12:21 PM
Share
धरणातील पाण्याचा आधार : यंदा अधिकच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी या पावसाचा फायदा रब्बी हंगामात झाला आहे. धरणात सरासरीपेक्षा अधिकचे पाणी असल्याने पिकांना पाणी सोडण्याची परवानगी पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

धरणातील पाण्याचा आधार : यंदा अधिकच्या पावसामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले असले तरी या पावसाचा फायदा रब्बी हंगामात झाला आहे. धरणात सरासरीपेक्षा अधिकचे पाणी असल्याने पिकांना पाणी सोडण्याची परवानगी पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

1 / 4
नदीकाठच्या शेतकऱ्यांना फायदा :वडज धरणातून मीना नदीपात्रात उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून या आवर्तनाचा मीना आणि घोड नदीकाठच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यामुळे करपू लागलेल्या पिकांना आता जीवदान मिळणार आहे.

नदीकाठच्या शेतकऱ्यांना फायदा :वडज धरणातून मीना नदीपात्रात उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून या आवर्तनाचा मीना आणि घोड नदीकाठच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे त्यामुळे करपू लागलेल्या पिकांना आता जीवदान मिळणार आहे.

2 / 4
ऊन्हाच्या झळा: वाढत्या उन्हाचा परिणाम उन्हाळी हंगामातील पिकांवर होत आहे. यामुळे पिके सुकू लागली आहेत. शिवाय जलस्त्रोतांनी तळ गाठल्याने शेतकरी धास्तावले आहे. गेल्या तीन महिन्यापासून पिकांची जोपासणा करुन आता उत्पादनात घट होणार याची धास्ती शेतकऱ्यांना आहे.

ऊन्हाच्या झळा: वाढत्या उन्हाचा परिणाम उन्हाळी हंगामातील पिकांवर होत आहे. यामुळे पिके सुकू लागली आहेत. शिवाय जलस्त्रोतांनी तळ गाठल्याने शेतकरी धास्तावले आहे. गेल्या तीन महिन्यापासून पिकांची जोपासणा करुन आता उत्पादनात घट होणार याची धास्ती शेतकऱ्यांना आहे.

3 / 4
यंदा प्रथमच उन्हाळी पिके बहरात : उन्हाळी पिके ही संपूर्ण साठलेल्या पाण्यावर अवलंबून असतात. दरवर्षी मार्च महिन्याच जलस्त्रोत हे तळ गाठतात. पण यंदा एप्रिलपर्यंत पाणी टिकून राहिले आहे. आता गरज निर्माण होताच धरणातील पाण्याचा शेतीमधील पिकांसाठी वापर केला जात आहे.

यंदा प्रथमच उन्हाळी पिके बहरात : उन्हाळी पिके ही संपूर्ण साठलेल्या पाण्यावर अवलंबून असतात. दरवर्षी मार्च महिन्याच जलस्त्रोत हे तळ गाठतात. पण यंदा एप्रिलपर्यंत पाणी टिकून राहिले आहे. आता गरज निर्माण होताच धरणातील पाण्याचा शेतीमधील पिकांसाठी वापर केला जात आहे.

4 / 4
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...