AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : कृषीपंपाचा विद्युत पुरवठा प्रश्न पेटला, कोल्हापूर, सांगलीत आंदोलनानंतर इचलकरंजीत ‘स्वाभिमानी’ची भूमिका काय?

इचलकरंजी : कृषीपंपाचा विद्युत पुरवठा हा दिवसा व्हावा तसेच रब्बी हंगामातील पिकांची अवस्था पाहता सलग 10 तास विद्युत पुरवठा व्हावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोल्हापूरात आंदोलनाला सुरवात केली होती. आता आंदोलनाची झळ ही सर्वत्र पोहचू लागली आहे. रात्रीच विद्युत पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना आपला जीव धोक्यात घालून पिकांना पाणी द्यावे लागत आहे. त्यामुळे दिवसा विद्युत पुरवठा करावा या मागणीसाठी इचलकरंजी शहरासह ग्रामीण भागात रास्तारोको करण्यात आला आहे. शिवाय मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेची आंदोलने सुरुच राहणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

| Edited By: राजेंद्र खराडे | Updated on: Mar 04, 2022 | 12:37 PM
Share
दिवसा अन् सुरळीत विद्युत पुरवठा: ऐन रब्बी हंगामात महावितरणकडून विद्युत पुरवठ्याचे वेळापत्रक हे जाहीर केले जाते. शिवाय हे शेतकऱ्यांच्या सोईचे नसल्याने असंख्य अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सध्या 8 तास अन् तोही अनियमित वीज पुरवठा असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सलग 10 तास आणि तोही दिवसा विद्युत पुरवठा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

दिवसा अन् सुरळीत विद्युत पुरवठा: ऐन रब्बी हंगामात महावितरणकडून विद्युत पुरवठ्याचे वेळापत्रक हे जाहीर केले जाते. शिवाय हे शेतकऱ्यांच्या सोईचे नसल्याने असंख्य अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. सध्या 8 तास अन् तोही अनियमित वीज पुरवठा असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सलग 10 तास आणि तोही दिवसा विद्युत पुरवठा करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

1 / 5
रात्रीच्या वेळी जीव धोक्यात : रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी सध्या रात्रीचा दिवस करीत आहे. असे असले तरी रात्री वन्यजीव आणि जंगली प्राण्यांमुळे जीव मुठीत घेऊन शेतीकामे  करावी लागत आहेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु असूनही या वेळापत्रकात कोणताच बदल केलेला नाही.

रात्रीच्या वेळी जीव धोक्यात : रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून शेतकरी सध्या रात्रीचा दिवस करीत आहे. असे असले तरी रात्री वन्यजीव आणि जंगली प्राण्यांमुळे जीव मुठीत घेऊन शेतीकामे करावी लागत आहेत. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु असूनही या वेळापत्रकात कोणताच बदल केलेला नाही.

2 / 5
घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त: यापूर्वी सांगली आणि कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विविध आंदोलने सुरु आहेत. शुक्रवारी इचलकरंजी येथे रास्तारोको करण्यात आला होता. कोणता गैरप्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. मात्र, आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

घटनास्थळी पोलिसांचा बंदोबस्त: यापूर्वी सांगली आणि कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने विविध आंदोलने सुरु आहेत. शुक्रवारी इचलकरंजी येथे रास्तारोको करण्यात आला होता. कोणता गैरप्रकार होऊ नये म्हणून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला होता. मात्र, आंदोलनादरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

3 / 5
मागण्या मान्य नाहीत तोपर्यंत आंदोलनाचे अस्त्र: शेतकऱ्यांच्या मागण्याकडे कायम सरकारचे दुर्लक्ष राहिलेले आहे. रब्बी हंगामातील उत्पादकता वाढवण्यासाठी पाण्याची गरज आहे. सध्या मुबलक प्रमाणात पाणी असतानाही केवळ विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

मागण्या मान्य नाहीत तोपर्यंत आंदोलनाचे अस्त्र: शेतकऱ्यांच्या मागण्याकडे कायम सरकारचे दुर्लक्ष राहिलेले आहे. रब्बी हंगामातील उत्पादकता वाढवण्यासाठी पाण्याची गरज आहे. सध्या मुबलक प्रमाणात पाणी असतानाही केवळ विद्युत पुरवठा सुरळीत होत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होत आहे.

4 / 5
रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने इचलकरंजी येथे रास्तारोको करण्यात आला होता. या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लगल्या होत्या. आंदोलन सुरु असूनही महावितरण कोणतीच भूमिका घेत नसल्याने आता वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने सुरु होत आहेत.

रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने इचलकरंजी येथे रास्तारोको करण्यात आला होता. या दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लगल्या होत्या. आंदोलन सुरु असूनही महावितरण कोणतीच भूमिका घेत नसल्याने आता वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलने सुरु होत आहेत.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली