AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमृता खानविलकरने थेट पतीला केलं ब्लॉक; अखेर हिमांशूने नात्याबद्दल सोडलं मौन

अभिनेत्री अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्यात समस्या सुरू असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर तिचा पती आणि अभिनेता हिमांशू मल्होत्राने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मौन सोडलं आहे. अमृताने त्याला ब्लॉक केलं होतं, असा खुलासा हिमांशूने केला.

| Updated on: May 20, 2025 | 11:59 AM
Share
अभिनेता हिमांशू मल्होत्रा आणि मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हे लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या नात्यात काही तक्रारी असल्याच्या चर्चा सतत होत आहेत. अमृताने पती हिमांशूला सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं. त्यानंतर चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.

अभिनेता हिमांशू मल्होत्रा आणि मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर हे लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहेत. परंतु गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या नात्यात काही तक्रारी असल्याच्या चर्चा सतत होत आहेत. अमृताने पती हिमांशूला सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं. त्यानंतर चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबद्दल संभ्रम निर्माण झाला होता.

1 / 7
आता सहा वर्षांनंतर अमृताचा पती आणि अभिनेता हिमांशूने यामागचं सत्य सांगितलं आहे. अमृतासोबत त्याचं नातं कसं आहे, खरंच त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या सुरू आहे का, या प्रश्नांची उत्तरं त्याने मोकळेपणे दिली.

आता सहा वर्षांनंतर अमृताचा पती आणि अभिनेता हिमांशूने यामागचं सत्य सांगितलं आहे. अमृतासोबत त्याचं नातं कसं आहे, खरंच त्यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या सुरू आहे का, या प्रश्नांची उत्तरं त्याने मोकळेपणे दिली.

2 / 7
'फिल्मीबीट प्राइम'ला दिलेल्या मुलाखतीत हिमांशूने सांगितलं की जवळपास 6 वर्षांपूर्वी अमृताने त्याला सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं. इतकंच नव्हे तर तिने त्याला अनफॉलोसुद्धा केलं होतं.

'फिल्मीबीट प्राइम'ला दिलेल्या मुलाखतीत हिमांशूने सांगितलं की जवळपास 6 वर्षांपूर्वी अमृताने त्याला सोशल मीडियावर ब्लॉक केलं होतं. इतकंच नव्हे तर तिने त्याला अनफॉलोसुद्धा केलं होतं.

3 / 7
हिमांशू म्हणाला, "तिने मला फक्त ब्लॉक केलं नव्हतं, तर अनफॉलोसुद्धा केलं होतं. मी शूटिंगमध्ये व्यस्त होतो आणि तिला माझ्याशी बोलायचं होतं. त्यादरम्यान आमच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात तिने मला ब्लॉक करून अनफॉलो केलं होतं."

हिमांशू म्हणाला, "तिने मला फक्त ब्लॉक केलं नव्हतं, तर अनफॉलोसुद्धा केलं होतं. मी शूटिंगमध्ये व्यस्त होतो आणि तिला माझ्याशी बोलायचं होतं. त्यादरम्यान आमच्यात वाद झाला आणि रागाच्या भरात तिने मला ब्लॉक करून अनफॉलो केलं होतं."

4 / 7
"त्यावेळी मी राजस्थानमध्ये शूटिंग करत होतो. माझं सात ते आठ दिवसांचं शूटिंग होतं. 2015 मध्ये आमचं लग्न झालं होतं. त्यानंतरची ही गोष्ट आहे. मला असं वाटतं की रागाच्या भरात किंवा घाईघाईत आपण कधीकधी असं वागतो", असं हिमांशूने स्पष्ट केलं.

"त्यावेळी मी राजस्थानमध्ये शूटिंग करत होतो. माझं सात ते आठ दिवसांचं शूटिंग होतं. 2015 मध्ये आमचं लग्न झालं होतं. त्यानंतरची ही गोष्ट आहे. मला असं वाटतं की रागाच्या भरात किंवा घाईघाईत आपण कधीकधी असं वागतो", असं हिमांशूने स्पष्ट केलं.

5 / 7
नंतर त्या दोघांमधील वाद संपुष्टात आले आणि आज लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही दोघं एकमेकांसोबत आहेत. याआधी 'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अमृता म्हणाली होती, "मी हिमांशूला ब्लॉक करून किती बालिश वागले होते, याची जाणीव मला आता होते. तो संपूर्ण रात्रभर मला कॉल करत होता. परंतु मी त्याचा नंबरसुद्धा ब्लॉक केला होता."

नंतर त्या दोघांमधील वाद संपुष्टात आले आणि आज लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही दोघं एकमेकांसोबत आहेत. याआधी 'बॉम्बे टाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत अमृता म्हणाली होती, "मी हिमांशूला ब्लॉक करून किती बालिश वागले होते, याची जाणीव मला आता होते. तो संपूर्ण रात्रभर मला कॉल करत होता. परंतु मी त्याचा नंबरसुद्धा ब्लॉक केला होता."

6 / 7
"रागाच्या भरात मी तशी वागले होते. यावरून आमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या सुरू असल्याच्या चर्चा होतील, याचा मी किंचितही विचार केला नव्हता", असं अमृता म्हणाली होती.

"रागाच्या भरात मी तशी वागले होते. यावरून आमच्या वैवाहिक आयुष्यात समस्या सुरू असल्याच्या चर्चा होतील, याचा मी किंचितही विचार केला नव्हता", असं अमृता म्हणाली होती.

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.