AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 WC 2026 Semi Final Scenarios : टीम इंडियाकडून मोठी चूक, वेस्ट इंडिजला न खेळताच सेमीफायनलमध्ये प्रवेशाची संधी

T20 WC 2026 Semi Final Scenarios : भारताने काल झिम्बाब्वे विरुद्ध विजय मिळवला. त्यामुळे टीम इंडिया टी20 वर्ल्ड कप 2026 च्या शर्यतीत टिकून आहे. सुपर-8 च्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा 76 धावांनी पराभव झाला. त्यामुळे टीम इंडियाच्या सेमीफायनल प्रवेशावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं.

| Updated on: Feb 27, 2026 | 10:32 AM
Share
झिम्बाब्वे विरुद्ध सुपर-8 च्या दुसऱ्या सामन्यात काल टीम इंडियाने आपल्या लौकीकाला साजेसा खेळ केला. पहिली फलंदाजी करताना भारताने 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 256 धावांचा डोंगर उभारला. फॉर्मसाठी चाचपडणाऱ्या अभिषेक शर्माला अखेर सूर गवसला. त्याने (55) आणि हार्दिक पंड्याने नाबाद (50) अर्धशतकी खेळी केली.

झिम्बाब्वे विरुद्ध सुपर-8 च्या दुसऱ्या सामन्यात काल टीम इंडियाने आपल्या लौकीकाला साजेसा खेळ केला. पहिली फलंदाजी करताना भारताने 20 ओव्हर्समध्ये 4 बाद 256 धावांचा डोंगर उभारला. फॉर्मसाठी चाचपडणाऱ्या अभिषेक शर्माला अखेर सूर गवसला. त्याने (55) आणि हार्दिक पंड्याने नाबाद (50) अर्धशतकी खेळी केली.

1 / 6
टीम इंडियाच्या 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 184 धावा केल्या. भारताने 72 धावांनी विजय मिळवला. संजू सॅमसन (24), अभिषेक शर्मा (55), इशान किशन (38), सूर्यकुमार यादव (33), हार्दिक पंड्या (50), तिलक वर्मा (55) या सगळ्यांनी जबरदस्त फलंदाजी केली.

टीम इंडियाच्या 257 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेने 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 184 धावा केल्या. भारताने 72 धावांनी विजय मिळवला. संजू सॅमसन (24), अभिषेक शर्मा (55), इशान किशन (38), सूर्यकुमार यादव (33), हार्दिक पंड्या (50), तिलक वर्मा (55) या सगळ्यांनी जबरदस्त फलंदाजी केली.

2 / 6
खरंतर भारताच्या एवढ्या विशाल लक्ष्यासमोर झिम्बाब्वे सहज गुडघे टेकेल असं वाटलं होतं. पण त्यांनी चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 184 धावा केल्या. यात ओपनर ब्रायनच शतक 3 धावांनी हुकलं. त्याने नाबाद 97 धावांची खेळी केली. अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.

खरंतर भारताच्या एवढ्या विशाल लक्ष्यासमोर झिम्बाब्वे सहज गुडघे टेकेल असं वाटलं होतं. पण त्यांनी चांगली लढत देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 6 बाद 184 धावा केल्या. यात ओपनर ब्रायनच शतक 3 धावांनी हुकलं. त्याने नाबाद 97 धावांची खेळी केली. अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ मिळाली नाही.

3 / 6
भारत-झिम्बाब्वे मॅच आधी नेट रनरेट महत्वाचा ठरणार असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. कारण दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजवर सहज विजय मिळवला. त्यामुळे आता पुढच्या भारत-वेस्ट इंडिज सामन्यात जी टीम जिंकेल तीच सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. हा सामना एकप्रकारे क्वार्टर फायनल आहे.

भारत-झिम्बाब्वे मॅच आधी नेट रनरेट महत्वाचा ठरणार असं वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. कारण दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजवर सहज विजय मिळवला. त्यामुळे आता पुढच्या भारत-वेस्ट इंडिज सामन्यात जी टीम जिंकेल तीच सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. हा सामना एकप्रकारे क्वार्टर फायनल आहे.

4 / 6
खरंतर काल भारताने एक चूक केली. झिम्बाब्वेला कमी धावसंख्येवर रोखून नेट रनरेट सुधारायला हवा होता. पण त्यांनी तसं केलं नाही. परिणामी भारतापेक्षा वेस्ट इंडिजचा रनरेट चांगला आहे. दक्षिण आफ्रिका 2 सामने, 4 पॉइंट  NRR +2.890, वेस्ट इंडिज 2 सामने, 2 पॉइंट  NRR +1.791,  भारत 2 सामने, 2 पॉइंट  NRR  -0.100, झिम्बाब्वे 2 सामने, 0 पॉइंट  NRR -4.475

खरंतर काल भारताने एक चूक केली. झिम्बाब्वेला कमी धावसंख्येवर रोखून नेट रनरेट सुधारायला हवा होता. पण त्यांनी तसं केलं नाही. परिणामी भारतापेक्षा वेस्ट इंडिजचा रनरेट चांगला आहे. दक्षिण आफ्रिका 2 सामने, 4 पॉइंट NRR +2.890, वेस्ट इंडिज 2 सामने, 2 पॉइंट NRR +1.791, भारत 2 सामने, 2 पॉइंट NRR -0.100, झिम्बाब्वे 2 सामने, 0 पॉइंट NRR -4.475

5 / 6
आता 1 मार्चला भारत-वेस्ट इंडिज सामना झाला तर ग्रुप 1 मधून विजेता संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला तर वेस्ट इंडिजकडे सेमीफायनल प्रवेशाची संधी असेल. कारण वेस्ट इंडिजचा नेट रनरेट भारतापेक्षा चांगला आहे.

आता 1 मार्चला भारत-वेस्ट इंडिज सामना झाला तर ग्रुप 1 मधून विजेता संघ सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला तर वेस्ट इंडिजकडे सेमीफायनल प्रवेशाची संधी असेल. कारण वेस्ट इंडिजचा नेट रनरेट भारतापेक्षा चांगला आहे.

6 / 6
Follow Us
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप
अशोक खरातचे अनेक फोन कॉल्स अन् ठाणे कनेक्शन... अंजली दमानिया करणार गौप.
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन
साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन.
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार...
आशा भोसले यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार....
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना
आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पार्ककडे रवाना.
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने
आक्षेपार्ह व्हायरल व्हिडीओ प्रकरणानंतर मंत्री झिरवाळ पहिल्यांदा कॅबिने.
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?
राज्यात उष्णतेचा तडाखा; हवामान खात्याकडून हिट वेव्हचा इशारा?.
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच
स्वरसाम्राज्ञीचा निरोप! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आशाताईंच.
मुस्लीम तरुणाकडून हिंदू नाव वापरुन 29 वर्षीय तरुणीची फसवणूक
मुस्लीम तरुणाकडून हिंदू नाव वापरुन 29 वर्षीय तरुणीची फसवणूक.
भोंदू अशोक खरातचा पाय खोलात, नाशिकमधील घरी आयकर विभागाकडून छापेमारी
भोंदू अशोक खरातचा पाय खोलात, नाशिकमधील घरी आयकर विभागाकडून छापेमारी.
खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा
खरात प्रकरणात नवा ट्विस्ट; रोहित पवारांचा भाजपवर अप्रत्यक्ष निशाणा.