AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोज मरे त्याला कोण रडे! मुंबईजवळील शहरात विघ्नहर्त्याच्या विसर्जन मिरवणुकीतच विघ्न, नेमकं काय घडलं?

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त रस्त्यांचा दावा केला होता, पण तो फोल ठरला. गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागला.

| Updated on: Sep 07, 2025 | 2:01 PM
Share
गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त रस्त्यांचा दावा करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा दावा फोल ठरल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे, गणरायाचे आगमन आणि आता विसर्जनही खड्ड्यातूनच होत आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याच्या मिरवणुकीतच विघ्न आल्याचे पाहायला मिळत आहे.

गणेशोत्सवापूर्वी खड्डेमुक्त रस्त्यांचा दावा करणाऱ्या कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा दावा फोल ठरल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. विशेष म्हणजे, गणरायाचे आगमन आणि आता विसर्जनही खड्ड्यातूनच होत आहे. त्यामुळे विघ्नहर्त्याच्या मिरवणुकीतच विघ्न आल्याचे पाहायला मिळत आहे.

1 / 8
कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्याच निवासस्थान बाहेर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. जर आयुक्तांच्या घरासमोरील रस्तेच असे असतील, तर शहरातील सामान्य नागरिकांच्या रस्त्यांची काय अवस्था असेल? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्याच निवासस्थान बाहेर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे. जर आयुक्तांच्या घरासमोरील रस्तेच असे असतील, तर शहरातील सामान्य नागरिकांच्या रस्त्यांची काय अवस्था असेल? असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

2 / 8
गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी शहराला खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी ठेकेदारांना तातडीने दुरुस्ती करण्याची सूचनाही देण्यात आली होती.

गणेशोत्सवाच्या काही दिवस आधीच कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी शहराला खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी ठेकेदारांना तातडीने दुरुस्ती करण्याची सूचनाही देण्यात आली होती.

3 / 8
मात्र प्रत्यक्षात हा दावा पोकळ ठरल्याचे चित्र दिसत आहे. गणेश मंडळांना आणि नागरिकांना गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच करावे लागले. त्यानंतर आता विसर्जन मिरवणुकाही याच खड्ड्यांतून मार्ग काढताना दिसत आहेत.

मात्र प्रत्यक्षात हा दावा पोकळ ठरल्याचे चित्र दिसत आहे. गणेश मंडळांना आणि नागरिकांना गणरायाचे आगमन खड्ड्यांतूनच करावे लागले. त्यानंतर आता विसर्जन मिरवणुकाही याच खड्ड्यांतून मार्ग काढताना दिसत आहेत.

4 / 8
कल्याण पश्चिमेकडील सिंडिकेट परिसरात आयुक्तांचे निवासस्थान आहे. याच निवासस्थानासमोरच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी हे खड्डे सिमेंटचे ब्लॉक टाकून तात्पुरते बुजवण्यात आले होते.

कल्याण पश्चिमेकडील सिंडिकेट परिसरात आयुक्तांचे निवासस्थान आहे. याच निवासस्थानासमोरच्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी हे खड्डे सिमेंटचे ब्लॉक टाकून तात्पुरते बुजवण्यात आले होते.

5 / 8
पण पावसाने आणि वाहतुकीने या तात्पुरत्या दुरुस्तीचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. आयुक्त अभिनव गोयल याच रस्त्यावरून रोज ये-जा करतात. तरीही त्यांच्या घरासमोरील रस्त्याची ही अवस्था पाहून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

पण पावसाने आणि वाहतुकीने या तात्पुरत्या दुरुस्तीचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. आयुक्त अभिनव गोयल याच रस्त्यावरून रोज ये-जा करतात. तरीही त्यांच्या घरासमोरील रस्त्याची ही अवस्था पाहून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

6 / 8
गणेश विसर्जनाच्या पवित्र दिवशीही रस्त्यांची ही दुर्दशा कायम असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. जेव्हा शहराचे प्रमुखच आपल्या घरासमोरील रस्त्याची काळजी घेऊ शकत नाहीत, तेव्हा त्यांनी शहरातील इतर रस्त्यांवर नियंत्रण कसे ठेवले असेल?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

गणेश विसर्जनाच्या पवित्र दिवशीही रस्त्यांची ही दुर्दशा कायम असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. जेव्हा शहराचे प्रमुखच आपल्या घरासमोरील रस्त्याची काळजी घेऊ शकत नाहीत, तेव्हा त्यांनी शहरातील इतर रस्त्यांवर नियंत्रण कसे ठेवले असेल?" असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.

7 / 8
गणेश भक्त आणि स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाच्या या कामावर टीका केली आहे. नागरिकांच्या मते, प्रशासन केवळ आश्वासन देतं. पण प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. नागरिकांचा हा संताप केडीएमसी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

गणेश भक्त आणि स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाच्या या कामावर टीका केली आहे. नागरिकांच्या मते, प्रशासन केवळ आश्वासन देतं. पण प्रत्यक्षात रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. नागरिकांचा हा संताप केडीएमसी प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.

8 / 8
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान
दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चांवर फडणवीसांचे मोठे विधान.
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान
राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरणावर रोहित पवारांचे मोठे विधान.
द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, उत्पादनात मोठी घट
द्राक्ष उत्पादकांच्या डोळ्यात पाणी, उत्पादनात मोठी घट.
अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू
अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी सुरू.
विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प;फडणवीस यांची प्रतिक्रिया
विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा अर्थसंकल्प;फडणवीस यांची प्रतिक्रिया.
भारतात डेटा सेंटर तयार करणाऱ्याऱ्यांना आर्थिक सूट
भारतात डेटा सेंटर तयार करणाऱ्याऱ्यांना आर्थिक सूट.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यपदी प्रफुल्ल पटेल?चर्चेवर काय केलं ट्विट
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यपदी प्रफुल्ल पटेल?चर्चेवर काय केलं ट्विट.
Budget 2026 Highlights : काय स्वस्त, काय महाग झालं? जाणून घ्या
Budget 2026 Highlights : काय स्वस्त, काय महाग झालं? जाणून घ्या.
7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा! मुंबई-पुणे मार्गाचाही समावेश
7 हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरची घोषणा! मुंबई-पुणे मार्गाचाही समावेश.
नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू – निर्मला सीतारामन
नवीन आयकर कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू – निर्मला सीतारामन.