AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

61 वर्षांपूर्वीचे ते गाणं आजही अर्धवट, कोणाला समजलंही नाही, लोक आवडीने ऐकतात

बॉलिवूडमधील गाणी आजही इतकी लोकप्रिय आहेत की ती प्रदर्शित होऊन कित्येक वर्ष उलटली आहे तरीही अनेकांच्या ओठांवर आहेत. त्यामधीलच एक गाणे असे आहे जे अर्धवट आहे पण प्रचंड लोकप्रिय आहे.

| Updated on: Jul 19, 2026 | 8:12 AM
Share
बॉलिवूडच्या खजिन्यात अशी अनेक गाणी आहेत जी काळाच्या ओघातही अमर झाली आहेत. त्यापैकी एक आहे, १९६५ सालचं मोहम्मद रफी यांचं सदाबहार गाणं. आजही लोक ते मन लावून ऐकतात, पण बहुतांश श्रोत्यांना माहिती नाही की हे गाणं अर्धवट आहे. आता हे गाणं नेमकं कोणतं आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? जाणून घेऊया या गाण्याविषयी...

बॉलिवूडच्या खजिन्यात अशी अनेक गाणी आहेत जी काळाच्या ओघातही अमर झाली आहेत. त्यापैकी एक आहे, १९६५ सालचं मोहम्मद रफी यांचं सदाबहार गाणं. आजही लोक ते मन लावून ऐकतात, पण बहुतांश श्रोत्यांना माहिती नाही की हे गाणं अर्धवट आहे. आता हे गाणं नेमकं कोणतं आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल? जाणून घेऊया या गाण्याविषयी...

1 / 5
सिनेमा ‘काजल’ मधील हे गाणं आहे. गाण्याची सुरुवात ‘छू लेने दो नाजुक होठों को...’ अशी आहे. चित्रपटात हे गाणं राजकुमार आणि मीना कुमारी यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. हिरो हिरोईनला दारू ऑफर करतो, असा सीन आहे.

सिनेमा ‘काजल’ मधील हे गाणं आहे. गाण्याची सुरुवात ‘छू लेने दो नाजुक होठों को...’ अशी आहे. चित्रपटात हे गाणं राजकुमार आणि मीना कुमारी यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. हिरो हिरोईनला दारू ऑफर करतो, असा सीन आहे.

2 / 5
दिग्दर्शक राम माहेश्वरी यांना या सीनसाठी फक्त दोन ओळींची शायरी हवी होती. महान शायर साहिर लुधियानवी यांनी दोन सुंदर शेर लिहिले. ते फक्त संवाद म्हणून वापरण्याचा विचार होता. पण संगीतकार रवी यांना या दोन ओळी ऐकताच एक अप्रतिम चाल सुचली. त्यांनी दिग्दर्शकांकडे आग्रह धरला की, यावर पूर्ण गाणं बनवावं. दिग्दर्शक थोडे संकोचले. त्यांना वाटले की, हिरोला हे गाणं शोभणार नाही. शेवटी त्यांनी अट घातली “फक्त या दोन शेरांवरच गाणं बनवा.”

दिग्दर्शक राम माहेश्वरी यांना या सीनसाठी फक्त दोन ओळींची शायरी हवी होती. महान शायर साहिर लुधियानवी यांनी दोन सुंदर शेर लिहिले. ते फक्त संवाद म्हणून वापरण्याचा विचार होता. पण संगीतकार रवी यांना या दोन ओळी ऐकताच एक अप्रतिम चाल सुचली. त्यांनी दिग्दर्शकांकडे आग्रह धरला की, यावर पूर्ण गाणं बनवावं. दिग्दर्शक थोडे संकोचले. त्यांना वाटले की, हिरोला हे गाणं शोभणार नाही. शेवटी त्यांनी अट घातली “फक्त या दोन शेरांवरच गाणं बनवा.”

3 / 5
रेकॉर्डिंगच्या दिवशी जेव्हा मोहम्मद रफी यांनी गाणं गायलं, तेव्हा स्टुडिओत उपस्थित प्रत्येक जण थक्क झाला. गाण्याच्या दोन ओळी संपताच निर्माते आणि वितरक दिग्दर्शकांकडे वळले आणि म्हणाले, “इतकं सुंदर गाणं फक्त दोन ओळींमध्ये कसं संपवणार? आम्हाला तिसरं कडवं हवं आहे!”

रेकॉर्डिंगच्या दिवशी जेव्हा मोहम्मद रफी यांनी गाणं गायलं, तेव्हा स्टुडिओत उपस्थित प्रत्येक जण थक्क झाला. गाण्याच्या दोन ओळी संपताच निर्माते आणि वितरक दिग्दर्शकांकडे वळले आणि म्हणाले, “इतकं सुंदर गाणं फक्त दोन ओळींमध्ये कसं संपवणार? आम्हाला तिसरं कडवं हवं आहे!”

4 / 5
तिसरं कडवं लिहिण्यासाठी साहिर लुधियानवी यांचा शोध घेण्यात आला, पण ते त्यावेळी उपलब्ध नव्हते. त्यामुळे गाणं अपूर्ण अवस्थेतच रेकॉर्ड करण्यात आलं. पण मोहम्मद रफी यांनी आपल्या मखमली आवाजात आणि अप्रतिम शैलीत गाणं इतक्या सुंदररीत्या संपवलं की, ऐकणाऱ्यांना ते अपूर्ण आहे हे कधीच समजलं नाही! गाण्यात दारूच्या नशेची भावना आहे, तरीही रफी साहेबांनी दारूला स्पर्शही न करता, केवळ आपल्या जादुई आवाजाने ते नशेतील गाणं अमर केलं.

तिसरं कडवं लिहिण्यासाठी साहिर लुधियानवी यांचा शोध घेण्यात आला, पण ते त्यावेळी उपलब्ध नव्हते. त्यामुळे गाणं अपूर्ण अवस्थेतच रेकॉर्ड करण्यात आलं. पण मोहम्मद रफी यांनी आपल्या मखमली आवाजात आणि अप्रतिम शैलीत गाणं इतक्या सुंदररीत्या संपवलं की, ऐकणाऱ्यांना ते अपूर्ण आहे हे कधीच समजलं नाही! गाण्यात दारूच्या नशेची भावना आहे, तरीही रफी साहेबांनी दारूला स्पर्शही न करता, केवळ आपल्या जादुई आवाजाने ते नशेतील गाणं अमर केलं.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...