AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वच्छता मोहिमांसारख्या उपक्रमांची गरज – मुख्यमंत्री

जुहू बिचची नियमितपणे स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच उपस्थित नागरिकांकडून हा बिच स्वच्छ आणि सुंदर असतो किंवा नाही तेही जाणून घेतले.

महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 21, 2023 | 1:40 PM
Share
जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत महामहिम राज्यपाल रमेश बैस जी यांच्यासह मुख्यमंत्री देखील सहभागी झाले होते. जी२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. तसेच सर्वांना स्वच्छतेची शपथ देऊन या अभियानाचे लोकचळवळीत रूपांतर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. या मोहिमेत महामहिम राज्यपाल रमेश बैस जी यांच्यासह मुख्यमंत्री देखील सहभागी झाले होते. जी२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. तसेच सर्वांना स्वच्छतेची शपथ देऊन या अभियानाचे लोकचळवळीत रूपांतर व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

1 / 5
यावेळी बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी २०१४ मध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर या अभियानाने जनआंदोलनाचे रुप घेतले आहे. देशातील प्रत्येक गाव, शहर स्वच्छतेच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. राज्य शासनानेही पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम सुरु केले असून त्यासाठी पाऊले उचलली आहेत. यात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता असल्याचे मत यासमयी व्यक्त केले.

यावेळी बोलताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी २०१४ मध्ये स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. त्यानंतर या अभियानाने जनआंदोलनाचे रुप घेतले आहे. देशातील प्रत्येक गाव, शहर स्वच्छतेच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. राज्य शासनानेही पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण उपक्रम सुरु केले असून त्यासाठी पाऊले उचलली आहेत. यात मोठ्या प्रमाणात लोकसहभाग वाढावा यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता असल्याचे मत यासमयी व्यक्त केले.

2 / 5
 पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वच्छता मोहिमांसारख्या उपक्रमांची गरज आहे. स्वच्छतेसाठी प्रत्येकाने आपल्या जीवनातला एक मिनिट वेळ दिला पाहिजे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि ऱ्हास कमी होईल. ग्लोबल वॅार्मिंग आणि वातारणातील बदलामुळे भेडसावणाऱ्या समस्यांपासून दिलासाही मिळेल असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी स्वच्छता मोहिमांसारख्या उपक्रमांची गरज आहे. स्वच्छतेसाठी प्रत्येकाने आपल्या जीवनातला एक मिनिट वेळ दिला पाहिजे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल आणि ऱ्हास कमी होईल. ग्लोबल वॅार्मिंग आणि वातारणातील बदलामुळे भेडसावणाऱ्या समस्यांपासून दिलासाही मिळेल असे मत यावेळी बोलताना व्यक्त केले.

3 / 5
जुहू बिचची नियमितपणे स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच उपस्थित नागरिकांकडून हा बिच स्वच्छ आणि सुंदर असतो किंवा नाही तेही जाणून घेतले. यावेळी नागरिकांनाही होकार देत मुंबई महानगरपालिकेच्या कामाला पोचपावती दिली.

जुहू बिचची नियमितपणे स्वच्छता करणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कामाचे कौतुक केले. तसेच उपस्थित नागरिकांकडून हा बिच स्वच्छ आणि सुंदर असतो किंवा नाही तेही जाणून घेतले. यावेळी नागरिकांनाही होकार देत मुंबई महानगरपालिकेच्या कामाला पोचपावती दिली.

4 / 5
याप्रसंगी केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री भुपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, प्रधान सचिव प्रविण दराडे, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि जी-२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

याप्रसंगी केंद्रीय पर्यावरण व वने मंत्री भुपेंद्र यादव, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमित साटम, प्रधान सचिव प्रविण दराडे, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल आणि जी-२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

5 / 5
Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....