AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूरज सहानुभूतीच्या जोरावर बिग बॉस जिंकला? टीकेवर निक्की म्हणाली, मी जिंकले असते तर..

'बिग बॉस मराठी 5'ची ट्रॉफी सूरज चव्हाणने जिंकल्यानंतर अनेकांनी त्याचं कौतुक केलं. तर काहींनी त्याच्यावर टीकासुद्धा केली. सूरजने सहानुभूतीच्या जोरावर बिग बॉसची ट्रॉफी पटकावल्याची टीका झाली. त्यावर आता निक्की तांबोळीने प्रतिक्रिया दिली आहे.

| Updated on: Oct 18, 2024 | 3:41 PM
Share
सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने 'बिग बॉस मराठी 5'चं विजेतेपद पटकावलं. निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता प्रभू वालावलकर यांना तगडी टक्कर देत त्याने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निक्कीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सूरज चव्हाणने 'बिग बॉस मराठी 5'चं विजेतेपद पटकावलं. निक्की तांबोळी, अभिजीत सावंत, धनंजय पोवार, अंकिता प्रभू वालावलकर यांना तगडी टक्कर देत त्याने बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे केली. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निक्कीने त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

1 / 5
"सूरज जिंकेल याची मला कल्पना नव्हती. पण जर चाहत्यांनी त्याला विजेता बनवलं असेल तर त्याला नाकारणारी मी कोण? जे तुमच्या नशिबात असतं तेच तुम्हाला मिळतं. कदाचित बिग बॉसची ट्रॉफी माझ्या नशिबात नव्हती. माझ्या नशिबात खूप सारं प्रेम होतं, जे मला मिळालं. त्यामुळे मी खुश आहे", असं निक्की म्हणाली.

"सूरज जिंकेल याची मला कल्पना नव्हती. पण जर चाहत्यांनी त्याला विजेता बनवलं असेल तर त्याला नाकारणारी मी कोण? जे तुमच्या नशिबात असतं तेच तुम्हाला मिळतं. कदाचित बिग बॉसची ट्रॉफी माझ्या नशिबात नव्हती. माझ्या नशिबात खूप सारं प्रेम होतं, जे मला मिळालं. त्यामुळे मी खुश आहे", असं निक्की म्हणाली.

2 / 5
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या या मुलाखतीत निक्की पुढे म्हणाली, "सूरज सहानुभूतीच्या जोरावर ट्रॉफी जिंकला अशा कमेंट्स मी वाचल्या होत्या. पण जर मी ती ट्रॉफी उचलली असती तर माझ्या चाहत्यांनी माझा द्वेष केला असता. आता चाहते त्याचा द्वेष करत आहेत. हे चक्र असंच सुरू असतं. त्यामुळे सत्य स्वीकारून आयुष्यात पुढे जायचं असतं."

'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या या मुलाखतीत निक्की पुढे म्हणाली, "सूरज सहानुभूतीच्या जोरावर ट्रॉफी जिंकला अशा कमेंट्स मी वाचल्या होत्या. पण जर मी ती ट्रॉफी उचलली असती तर माझ्या चाहत्यांनी माझा द्वेष केला असता. आता चाहते त्याचा द्वेष करत आहेत. हे चक्र असंच सुरू असतं. त्यामुळे सत्य स्वीकारून आयुष्यात पुढे जायचं असतं."

3 / 5
बिग बॉसच्या घरात निक्कीची सतत अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याशी भांडणं व्हायची. त्यांच्याशी उद्धटपणे बोलल्याची खंतही तिने यावेळी व्यक्त केली. "मी तिथेच त्यांची माफी मागितली होती. मला तो शो गाजवायचा होता, त्यामुळे मी तसं केलं", असं तिने स्पष्ट केलं.

बिग बॉसच्या घरात निक्कीची सतत अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्याशी भांडणं व्हायची. त्यांच्याशी उद्धटपणे बोलल्याची खंतही तिने यावेळी व्यक्त केली. "मी तिथेच त्यांची माफी मागितली होती. मला तो शो गाजवायचा होता, त्यामुळे मी तसं केलं", असं तिने स्पष्ट केलं.

4 / 5
बिग बॉसच्या घरात निक्की आणि अरबाज पटेलचं प्रेमप्रकरण खूप गाजलं. घराबाहेर पडल्यानंतरही त्यांची मैत्री कायम असल्याचं दिसून येत आहे. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेच्या आधीच अरबाज बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला होता.

बिग बॉसच्या घरात निक्की आणि अरबाज पटेलचं प्रेमप्रकरण खूप गाजलं. घराबाहेर पडल्यानंतरही त्यांची मैत्री कायम असल्याचं दिसून येत आहे. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेच्या आधीच अरबाज बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला होता.

5 / 5
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?
अजित पवार यांच्या विमानात बॉम्ब होता का?.
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही
एक स्वीकृत नगरसेवकपद मिळण्यासाठी मनसे आग्रही.
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल
सुनेत्रा पवारांचा शपथविधी इतक्या लवकर का? शिवसेना नेत्यांचा सवाल.
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?
महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपला MIM चा पाठिंबा?.
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड
कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांची निवड.
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून
भाजपचंच वर्चस्व... आठ महापालिकेत कोण बनलं महापौर? घ्या जाणून.
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?
मोदींचा विद्यार्थ्यांना कानमंत्र, कोणत्या विषयाला किती वेळ द्यायचा?.
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये
मुंबईच्या राजकारणात उलथापालथ; शरद पवार गटाचा आवाज सत्ताधाऱ्यांमध्ये.
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल
महत्वाच्या महामार्गावर 32 तास वाहतूक ठप्प; प्रशासन यंत्रणेवर सवाल.
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
सत्ता हातात आली की शिंगं फुटतात; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल.