PHOTO | सीमेवरील जवानांसाठी दिवाळी फराळ; स्वयंसेवी संस्था पाठवणार 14 हजार लाडू!

करोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत लेह-लडाख, उधमपूर, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम येथील सीमेवरील सैनिकांना चौदा हजार पौष्टिक लाडू पाठवण्यात आले आहेत.

| Updated on: Nov 11, 2020 | 2:56 PM
दिवाळीच्या दिवशी सैनिकांबद्दल असलेल्या प्रेम आणि कृतज्ञतेपोटी त्यांना आपल्या हाताने बनवलेला फराळ खाऊ घालावा, अशी संकल्पना पनवेल येथील भारतीय विकास परिषदेला सूचली. त्यांनी ती पूर्णत्वासही नेली. करोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत लेह-लडाख, उधमपूर, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम येथील सीमेवरील सैनिकांना चौदा हजार पौष्टिक लाडू पाठवण्यात आले आहेत.

दिवाळीच्या दिवशी सैनिकांबद्दल असलेल्या प्रेम आणि कृतज्ञतेपोटी त्यांना आपल्या हाताने बनवलेला फराळ खाऊ घालावा, अशी संकल्पना पनवेल येथील भारतीय विकास परिषदेला सूचली. त्यांनी ती पूर्णत्वासही नेली. करोनाच्या प्रतिकूल परिस्थितीत लेह-लडाख, उधमपूर, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, आसाम येथील सीमेवरील सैनिकांना चौदा हजार पौष्टिक लाडू पाठवण्यात आले आहेत.

1 / 6
सीमेवर फराळ पाठवणे सहज, सोपे नाही. कारण फराळातील प्रत्येक पदार्थाची गुणवत्ता, टिकावूपणा, पदार्थ बनवताना वापरलेले साहित्य, पाठविण्यासाठी लष्कराचे नियम तसेच संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी अशी सगळी प्रक्रिया पार पाडली. लष्कराच्या गुणवत्ता यादीत परिपूर्ण उतरणारा, पौष्टिक लाडू तयार करून देण्याची तयारी डोंबिवली येथील "लाडू-सम्राट" यांनी दर्शवली. अशा रितीने "जवानांनासाठी पौष्टिक लाडू" पाठविण्याचा संकल्प भाविप संस्थेला पूर्ण करता आला, अशी माहिती संस्थेच्या पद्मजा कुलकर्णी यांनी सांगितले.

सीमेवर फराळ पाठवणे सहज, सोपे नाही. कारण फराळातील प्रत्येक पदार्थाची गुणवत्ता, टिकावूपणा, पदार्थ बनवताना वापरलेले साहित्य, पाठविण्यासाठी लष्कराचे नियम तसेच संबंधित अधिकाऱ्यांची परवानगी अशी सगळी प्रक्रिया पार पाडली. लष्कराच्या गुणवत्ता यादीत परिपूर्ण उतरणारा, पौष्टिक लाडू तयार करून देण्याची तयारी डोंबिवली येथील "लाडू-सम्राट" यांनी दर्शवली. अशा रितीने "जवानांनासाठी पौष्टिक लाडू" पाठविण्याचा संकल्प भाविप संस्थेला पूर्ण करता आला, अशी माहिती संस्थेच्या पद्मजा कुलकर्णी यांनी सांगितले.

2 / 6
लेह, लडाख येथील हवामानाचा अंदाज घेऊन ऑक्टोबर महिन्यातच पाच हजार लाडवांची पहिली खेप पाठवण्यात आली. उर्वरित नऊ हजार लाडू उधमपूर, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि आसाम येथे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाठवण्यात आले.  लाडुंबरोबरच अनेकांनी तयार केलेली शुभेच्छा पत्रे आणि संस्थेचे अध्यक्ष गिरीश समुद्र यांची स्वरचित कविता शुभेच्छा पत्राला जोडून छान संदेश पाठवण्यात आला, असे पद्मजा कुलकर्णी यांनी सांगितले.

लेह, लडाख येथील हवामानाचा अंदाज घेऊन ऑक्टोबर महिन्यातच पाच हजार लाडवांची पहिली खेप पाठवण्यात आली. उर्वरित नऊ हजार लाडू उधमपूर, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि आसाम येथे नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाठवण्यात आले. लाडुंबरोबरच अनेकांनी तयार केलेली शुभेच्छा पत्रे आणि संस्थेचे अध्यक्ष गिरीश समुद्र यांची स्वरचित कविता शुभेच्छा पत्राला जोडून छान संदेश पाठवण्यात आला, असे पद्मजा कुलकर्णी यांनी सांगितले.

3 / 6
 सैनिकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आणि संस्थेवरील विश्वासामुळे मुंबई तसेच महाराष्ट्रातील वेगगेळ्या भागातून जवळपास चारशे लोकांनी उत्स्फुर्तपणे निधी पाठवून या उपक्रमात मोलाचे योगदान दिले, असंही त्यांनी सांगितलं.

सैनिकांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आणि संस्थेवरील विश्वासामुळे मुंबई तसेच महाराष्ट्रातील वेगगेळ्या भागातून जवळपास चारशे लोकांनी उत्स्फुर्तपणे निधी पाठवून या उपक्रमात मोलाचे योगदान दिले, असंही त्यांनी सांगितलं.

4 / 6
सैनिकांसाठी लाडू पाठवण्याची पक्रिया पार पाडत असताना करोनाचे संकटाचे भान ठेवून संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतर राखून शेवटची खेप पाठवताना सलग 12 तास काम केले.

सैनिकांसाठी लाडू पाठवण्याची पक्रिया पार पाडत असताना करोनाचे संकटाचे भान ठेवून संस्थेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सामाजिक अंतर राखून शेवटची खेप पाठवताना सलग 12 तास काम केले.

5 / 6
संस्थेचे हे पहिलेच वर्ष असूनही सैनिकांना दिवाळीसाठी फराळ म्हणून लाडू पाठवण्याचे शिवधनुष्य भाविपने यशस्वीरित्या पेलले. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष गिरीश समुद्र, सचिव कमांडर दीपक जांबेकर, खजिनदार नितीन कानिटकर यांसह अन्य पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यापुढेही असेच उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

संस्थेचे हे पहिलेच वर्ष असूनही सैनिकांना दिवाळीसाठी फराळ म्हणून लाडू पाठवण्याचे शिवधनुष्य भाविपने यशस्वीरित्या पेलले. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष गिरीश समुद्र, सचिव कमांडर दीपक जांबेकर, खजिनदार नितीन कानिटकर यांसह अन्य पदाधिकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यापुढेही असेच उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.