AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आधी विराटवर चिडला, नंतर केली उपरोधिक टिप्पणी; आता क्रिकेटरने अनब्लॉक करताच राहुल वैद्यचे बदलले सूर

राहुल वैद्यने अखेर क्रिकेटर विराट कोहलीसोबतचा वाद मिटवल्याचं दिसून येत आहे. विराटनेही त्याला इन्स्टाग्रामवर अनब्लॉक केलं आहे. यानंतर राहुलने सोशल मीडियावर पोस्ट लिहित विराटचे आभार मानले आहेत.

| Updated on: May 18, 2025 | 4:20 PM
Share
गायक राहुल वैद्य गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. क्रिकेटर विराट कोहलीने त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याचं राहुलने म्हटलं होतं. यावरून त्याने विराटवर उपरोधिक टिप्पणीसुद्धा केली होती. या सर्व ड्रामानंतर अखेर विराटने त्याला इन्स्टाग्रामवर अनब्लॉक केलं आहे.

गायक राहुल वैद्य गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. क्रिकेटर विराट कोहलीने त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याचं राहुलने म्हटलं होतं. यावरून त्याने विराटवर उपरोधिक टिप्पणीसुद्धा केली होती. या सर्व ड्रामानंतर अखेर विराटने त्याला इन्स्टाग्रामवर अनब्लॉक केलं आहे.

1 / 5
विराटने अनब्लॉक करताच राहुलने त्याचे आभार मानण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. 'मला अनब्लॉक करण्यासाठी विराट कोहली तुझे आभार. क्रिकेटमधील तू सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेस आणि भारताचा तू गर्वआहेस. जय हिंद. तुला आणि तुझ्या कुटुंबीयांवर सदैव देवाचा आशीर्वाद राहो', अशी पोस्ट राहुलने लिहिली आहे.

विराटने अनब्लॉक करताच राहुलने त्याचे आभार मानण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. 'मला अनब्लॉक करण्यासाठी विराट कोहली तुझे आभार. क्रिकेटमधील तू सर्वोत्कृष्ट फलंदाज आहेस आणि भारताचा तू गर्वआहेस. जय हिंद. तुला आणि तुझ्या कुटुंबीयांवर सदैव देवाचा आशीर्वाद राहो', अशी पोस्ट राहुलने लिहिली आहे.

2 / 5
'ज्या बालिश लोकांनी माझ्या पत्नीला आणि बहिणीला शिवीगाळ केली, माझ्या लहान मुलीचे फोटो मॉर्फ केले आणि मला, माझ्या जवळच्या व्यक्तींना असंख्य द्वेषपूर्ण मेसेज पाठवले, त्यांनासुद्धा देव सदबुद्धी देवो. मी त्याच भाषेत किंवा त्याहून वाईट प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकतो, पण मी तसं करणार नाही. कारण त्यामुळे फक्त नकारात्मकता पसरेल आणि त्यातून काहीच सिद्ध होणार नाही', अशा शब्दांत त्याने ट्रोलर्सना सुनावलं आहे.

'ज्या बालिश लोकांनी माझ्या पत्नीला आणि बहिणीला शिवीगाळ केली, माझ्या लहान मुलीचे फोटो मॉर्फ केले आणि मला, माझ्या जवळच्या व्यक्तींना असंख्य द्वेषपूर्ण मेसेज पाठवले, त्यांनासुद्धा देव सदबुद्धी देवो. मी त्याच भाषेत किंवा त्याहून वाईट प्रकारे प्रतिक्रिया देऊ शकतो, पण मी तसं करणार नाही. कारण त्यामुळे फक्त नकारात्मकता पसरेल आणि त्यातून काहीच सिद्ध होणार नाही', अशा शब्दांत त्याने ट्रोलर्सना सुनावलं आहे.

3 / 5
या पोस्टमध्ये राहुलने विराटच्या भावाचाही उल्लेख केला आहे. "विकास कोहली भावा, तू जे काही मला म्हणालास, त्याचं मला वाईट वाटलं नाही. मला माहीत आहे की तू माणूस म्हणून खूप चांगला आहेत. मँचेस्टर किंवा ओवल स्टेडियमबाहेर झालेली तुझी भेट आणि माझ्या गायनाविषयी तू बोललेल्या चांगल्या गोष्टी मला आजही आठवत आहेत", असं त्याने पुढे म्हटलंय.

या पोस्टमध्ये राहुलने विराटच्या भावाचाही उल्लेख केला आहे. "विकास कोहली भावा, तू जे काही मला म्हणालास, त्याचं मला वाईट वाटलं नाही. मला माहीत आहे की तू माणूस म्हणून खूप चांगला आहेत. मँचेस्टर किंवा ओवल स्टेडियमबाहेर झालेली तुझी भेट आणि माझ्या गायनाविषयी तू बोललेल्या चांगल्या गोष्टी मला आजही आठवत आहेत", असं त्याने पुढे म्हटलंय.

4 / 5
विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याचं सांगितल्यानंतर राहुलने त्याच्या चाहत्यांनाही सुनावलं होतं. "विराट कोहलीचे चाहते हे त्याच्यापेक्षाही मोठे जोकर्स आहेत", असं त्याने म्हटलं होतं. त्यानंतर विकास कोहलीने राहुलसाठी पोस्ट लिहिली होती. एवढी मेहनत आपल्या गाण्यावर घेतली असती तर कदाचित प्रसिद्ध झाला असला, अशी टीका विकासने केली होती.

विराट कोहलीने इन्स्टाग्रामवर ब्लॉक केल्याचं सांगितल्यानंतर राहुलने त्याच्या चाहत्यांनाही सुनावलं होतं. "विराट कोहलीचे चाहते हे त्याच्यापेक्षाही मोठे जोकर्स आहेत", असं त्याने म्हटलं होतं. त्यानंतर विकास कोहलीने राहुलसाठी पोस्ट लिहिली होती. एवढी मेहनत आपल्या गाण्यावर घेतली असती तर कदाचित प्रसिद्ध झाला असला, अशी टीका विकासने केली होती.

5 / 5
Follow Us
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी
आमची जमीन परत द्या, खरातला मंदिराला जागा देणाऱ्या माळी बंधूंची मागणी.
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी
खरात-तटकरे-चाकणकर यांचे CDR तपासा, शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी.