AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोक बिशन सिंग बेदींचे उत्तराधिकारी म्हणायचे, 11 वर्षात 100 रन्सही नाही केले, वयाच्या 27 वर्षी करिअर संपलं!

मनिंदर सिंग जेव्हा टीम इंडियामध्ये आले तेव्हा त्यांना बिशनसिंग बेदींचा उत्तराधिकारी म्हटलं जात असे. ते बिशनसिंग बेदींसारखे डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करीत असे परंतु त्यांचे करियर वयाच्या केवळ 27 व्या वर्षी संपलं. Maninder Singh born on this day

| Updated on: Jun 13, 2021 | 9:29 AM
Share
हा खेळाडू जेव्हा टीम इंडियामध्ये आला तेव्हा त्याला बिशनसिंग बेदींचा उत्तराधिकारी म्हटलं जात असे. तो बिशनसिंग बेदींसारखा डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करीत असे परंतु त्याचे करियर वयाच्या केवळ 27 व्या वर्षी संपलं. या क्रिकेटपटूची कहाणी भारतीय क्रिकेटमधील निराशाजनक कहाण्यांपैकी एक असू शकते. पुढे क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर या खेळाडूचे नाव अनेक वादांशी संबंधित होते. मनिंदर सिंग असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 13 जून 1965 रोजी पुण्यात झाला.

हा खेळाडू जेव्हा टीम इंडियामध्ये आला तेव्हा त्याला बिशनसिंग बेदींचा उत्तराधिकारी म्हटलं जात असे. तो बिशनसिंग बेदींसारखा डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करीत असे परंतु त्याचे करियर वयाच्या केवळ 27 व्या वर्षी संपलं. या क्रिकेटपटूची कहाणी भारतीय क्रिकेटमधील निराशाजनक कहाण्यांपैकी एक असू शकते. पुढे क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर या खेळाडूचे नाव अनेक वादांशी संबंधित होते. मनिंदर सिंग असे या क्रिकेटपटूचे नाव आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 13 जून 1965 रोजी पुण्यात झाला.

1 / 5
मनिंदर सिंगने पाकिस्तानविरुद्ध 1982-83 च्या कराची कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांचे वय 17 वर्षे 193 दिवस होते. यासह, त्यावेळी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे ते सर्वात तरुण खेळाडू ठरले. मनिंदर सिंग भारताकडून 35 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 37 च्या सरासरीने 88 बळी घेतले. त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती 27 धावांत 7 गडी बाद.... आणि 59 एकदिवसीय सामन्यात त्यांनी 66 बळी घेतले. त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती 22 धावांत चार गडी बाद...

मनिंदर सिंगने पाकिस्तानविरुद्ध 1982-83 च्या कराची कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांचे वय 17 वर्षे 193 दिवस होते. यासह, त्यावेळी भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारे ते सर्वात तरुण खेळाडू ठरले. मनिंदर सिंग भारताकडून 35 कसोटी सामने खेळले. यात त्यांनी 37 च्या सरासरीने 88 बळी घेतले. त्यांची सर्वोत्कृष्ट कामगिरी होती 27 धावांत 7 गडी बाद.... आणि 59 एकदिवसीय सामन्यात त्यांनी 66 बळी घेतले. त्यांची सर्वोत्तम कामगिरी होती 22 धावांत चार गडी बाद...

2 / 5
मनिंदरसिंगच्या कारकीर्दीची सुरुवात चांगली झाली पण अचानक त्यांची लय गेली. यामुळे त्यांना संघातून वगळण्यात आले. त्यानंतर ते पूर्वीसारखं कधीच खेळू शकले नाहीत. अशाप्रकारे, 1993 मध्ये त्यांनी भारताकडून शेवटचा सामना खेळला. त्यावेळी त्याचं वय केवळ 27 वर्ष होतं.

मनिंदरसिंगच्या कारकीर्दीची सुरुवात चांगली झाली पण अचानक त्यांची लय गेली. यामुळे त्यांना संघातून वगळण्यात आले. त्यानंतर ते पूर्वीसारखं कधीच खेळू शकले नाहीत. अशाप्रकारे, 1993 मध्ये त्यांनी भारताकडून शेवटचा सामना खेळला. त्यावेळी त्याचं वय केवळ 27 वर्ष होतं.

3 / 5
मनिंदर सिंगच्या नावे नकोसा रेकॉर्ड आहे. तो अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्यांनी त्यांच्या संपूर्ण कसोटी कारकीर्दीत 100 धावा केल्या नाहीत. तसेच 1986-87 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची मद्रास कसोटी रोमांचक झाली, या कसोटीत ते सर्वांत शेवटी आऊट झालेले फलंदाज होते. त्यामुळे सामना टाय झाला होता.

मनिंदर सिंगच्या नावे नकोसा रेकॉर्ड आहे. तो अशा खेळाडूंपैकी एक आहे ज्यांनी त्यांच्या संपूर्ण कसोटी कारकीर्दीत 100 धावा केल्या नाहीत. तसेच 1986-87 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची मद्रास कसोटी रोमांचक झाली, या कसोटीत ते सर्वांत शेवटी आऊट झालेले फलंदाज होते. त्यामुळे सामना टाय झाला होता.

4 / 5
दुसरीकडे, मनिंदरसिंग क्रिकेटपासून दूर झाल्यानंतर अधिकच वादात राहिले. त्यांना दारूचं व्यसन होतं. 2007 मध्ये दिल्ली पोलिसांनी त्याला कोकेन बाळगल्याबद्दल अटक केली. त्याच्या घरातून 1.5 ग्रॅम कोकेन सापडल्याचा पोलिसांचा आरोप होता. मात्र, 2012 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली.

दुसरीकडे, मनिंदरसिंग क्रिकेटपासून दूर झाल्यानंतर अधिकच वादात राहिले. त्यांना दारूचं व्यसन होतं. 2007 मध्ये दिल्ली पोलिसांनी त्याला कोकेन बाळगल्याबद्दल अटक केली. त्याच्या घरातून 1.5 ग्रॅम कोकेन सापडल्याचा पोलिसांचा आरोप होता. मात्र, 2012 मध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झाली.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.