AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA, T20 World Cup Final: भारताचे हे 4 खेळाडू भारताला जिंकवून देणार ICC ट्रॉफी

भारताने 2013 मध्ये इंग्लंडला पराभूत करत आयसीसीची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारताने सातत्याने उपांत्य फेरी किंवा अंतिम फेरी गाठली आहे. पण टीम इंडियाला ट्रॉफी जिंकता आली नाही. आता टीम इंडियाला पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पोहोचली आहे. बार्बाडोस येथे 29 जून रोजी ICC T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. या सामन्यात 4 खेळाडू फार महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. कोण आहेत ते चार खेळाडू जाणून घ्या.

| Updated on: Jun 28, 2024 | 3:15 PM
Share
भारतीय संघाचा जादूगार फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांचा वेस्ट इंडिजच्या लेगमध्ये प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. कुलदीपने आतापर्यंत खेळलेल्या केवळ 4 सामन्यांत 10 विकेट घेतले आहेत. उपांत्य फेरीत त्याने इंग्लंडविरुद्ध ३ विकेट घेतले होते. यादव आफ्रिकेच्या विरुद्ध चांगली खेळी करु शकतो.

भारतीय संघाचा जादूगार फिरकी गोलंदाज कुलदीप यादव यांचा वेस्ट इंडिजच्या लेगमध्ये प्लेइंग 11 मध्ये समावेश करण्यात आला आहे. कुलदीपने आतापर्यंत खेळलेल्या केवळ 4 सामन्यांत 10 विकेट घेतले आहेत. उपांत्य फेरीत त्याने इंग्लंडविरुद्ध ३ विकेट घेतले होते. यादव आफ्रिकेच्या विरुद्ध चांगली खेळी करु शकतो.

1 / 4
भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने या विश्वचषकात भारतासाठी काही चांगल्या खेळी खेळल्या आहेत. या विश्वचषकात त्याने 7 सामन्यात 196 धावा केल्या आहेत. तो आफ्रिकेविरुद्ध मोठी खेळी खेळू शकतो.

भारताचा स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने या विश्वचषकात भारतासाठी काही चांगल्या खेळी खेळल्या आहेत. या विश्वचषकात त्याने 7 सामन्यात 196 धावा केल्या आहेत. तो आफ्रिकेविरुद्ध मोठी खेळी खेळू शकतो.

2 / 4
भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल सध्या बॅट आणि बॉल दोन्हीने चांगली कामगिरी करत आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध ३ विकेट घेत निर्णायक भूमिका बजावली. शेवटी फलंदाजीला आल्यावर त्याने षटकारही मारला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. अक्षरकडून दक्षिण आफ्रिके विरुद्ध चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल सध्या बॅट आणि बॉल दोन्हीने चांगली कामगिरी करत आहे. त्याने इंग्लंडविरुद्ध ३ विकेट घेत निर्णायक भूमिका बजावली. शेवटी फलंदाजीला आल्यावर त्याने षटकारही मारला. त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. अक्षरकडून दक्षिण आफ्रिके विरुद्ध चांगल्या खेळीची अपेक्षा आहे.

3 / 4
विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची बॅट चांगलीच चालत आहे. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू आहे. त्याने 7 सामन्यात 248 धावा केल्या आहेत. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९२ आणि इंग्लंडविरुद्ध ५७ धावा केल्या होत्या. अंतिम फेरीत तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या फलंदाजीने आफ्रिकेविरुद्ध चांगली खेळी करु शकतो. 

विश्वचषकात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माची बॅट चांगलीच चालत आहे. तो या स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा तिसरा खेळाडू आहे. त्याने 7 सामन्यात 248 धावा केल्या आहेत. रोहितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९२ आणि इंग्लंडविरुद्ध ५७ धावा केल्या होत्या. अंतिम फेरीत तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या फलंदाजीने आफ्रिकेविरुद्ध चांगली खेळी करु शकतो. 

4 / 4
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.