AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SL : मोहालीच्या मैदानात अश्विनचा जलवा, रिचर्ड हॅडलीचा रेकॉर्ड मोडित, कपिल देवचा विक्रम टप्प्यात

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा फलंदाजांना त्याच्यासमोर उभं राहणं सोपं नसतं. कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत भारताचा सर्वात मोठा मॅचविनर म्हणून उदयास आलेल्या अश्विनने प्रत्येक सामन्यासह आपली आकडेवारी आणि रेकॉर्ड सुधारणे सुरूच ठेवले आहे.

| Updated on: Mar 05, 2022 | 8:14 PM
Share
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा फलंदाजांना त्याच्यासमोर उभं राहणं सोपं नसतं. कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत भारताचा सर्वात मोठा मॅचविनर म्हणून उदयास आलेल्या अश्विनने प्रत्येक सामन्यासह आपली आकडेवारी आणि रेकॉर्ड सुधारणे सुरूच ठेवले आहे. आज मोहालीत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अश्विनने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला.

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन जेव्हा जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा फलंदाजांना त्याच्यासमोर उभं राहणं सोपं नसतं. कसोटी क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत भारताचा सर्वात मोठा मॅचविनर म्हणून उदयास आलेल्या अश्विनने प्रत्येक सामन्यासह आपली आकडेवारी आणि रेकॉर्ड सुधारणे सुरूच ठेवले आहे. आज मोहालीत श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अश्विनने आणखी एक विक्रम आपल्या नावे केला.

1 / 5
भारताचा अनुभवी फिरकीपटू अश्विनने शनिवारी 5 मार्च रोजी श्रीलंकेच्या पहिल्या डावात 2 बळी घेतले. यामध्ये दुसरी विकेट धनंजया डी सिल्वाची होती, ज्याला अश्विनने पायचित केले. यासह अश्विनने न्यूझीलंडचा महान वेगवान गोलंदाज रिचर्ड हॅडलीला मागे टाकले. विशेष म्हणजे या कामगिरीसह अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या आता 11 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Photo: AFP)

भारताचा अनुभवी फिरकीपटू अश्विनने शनिवारी 5 मार्च रोजी श्रीलंकेच्या पहिल्या डावात 2 बळी घेतले. यामध्ये दुसरी विकेट धनंजया डी सिल्वाची होती, ज्याला अश्विनने पायचित केले. यासह अश्विनने न्यूझीलंडचा महान वेगवान गोलंदाज रिचर्ड हॅडलीला मागे टाकले. विशेष म्हणजे या कामगिरीसह अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या आता 11 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Photo: AFP)

2 / 5
अश्विनचा हा 432 वा कसोटी बळी ठरला आणि त्यामुळे त्याने हॅडलीला (431) मागे टाकले. हॅडलीने 86 कसोटींमध्ये इतक्या विकेट्स घेतल्या होत्या आणि अश्विनने केवळ 85 कसोटींमध्ये ही कामगिरी केली आहे. (Photo: BCCI/ICC)

अश्विनचा हा 432 वा कसोटी बळी ठरला आणि त्यामुळे त्याने हॅडलीला (431) मागे टाकले. हॅडलीने 86 कसोटींमध्ये इतक्या विकेट्स घेतल्या होत्या आणि अश्विनने केवळ 85 कसोटींमध्ये ही कामगिरी केली आहे. (Photo: BCCI/ICC)

3 / 5
हॅडली हा 1993 पर्यंत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता, ज्याचा विक्रम भारतीय अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी मोडला होता. कपिल यांनी आपल्या कारकिर्दीत 434 विकेट घेत हा विक्रम आपल्या नावे केला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम जवळपास 7 वर्षे कपिलच्या नावावर होता आणि आता अश्विनला या सामन्यात कपिलला मागे टाकण्याची संधी आहे. कपिलला मागे टाकण्यासाठी अश्विनला फक्त 3 विकेट्सची गरज आहे. (Photo: File/ICC)

हॅडली हा 1993 पर्यंत सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज होता, ज्याचा विक्रम भारतीय अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांनी मोडला होता. कपिल यांनी आपल्या कारकिर्दीत 434 विकेट घेत हा विक्रम आपल्या नावे केला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम जवळपास 7 वर्षे कपिलच्या नावावर होता आणि आता अश्विनला या सामन्यात कपिलला मागे टाकण्याची संधी आहे. कपिलला मागे टाकण्यासाठी अश्विनला फक्त 3 विकेट्सची गरज आहे. (Photo: File/ICC)

4 / 5
अश्विनच्या दोन विकेट्सच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेच्या पहिल्या डावात 4 गडी बाद केले, त्याबदल्यात पाहुण्यांना केवळ 104 धावा करता आल्या होत्या. अशा स्थितीत तिसऱ्या दिवशी अश्विन आणखी 3 विकेट घेत कपिल देवला मागे टाकू शकतो. (Photo: AFP)

अश्विनच्या दोन विकेट्सच्या जोरावर भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेच्या पहिल्या डावात 4 गडी बाद केले, त्याबदल्यात पाहुण्यांना केवळ 104 धावा करता आल्या होत्या. अशा स्थितीत तिसऱ्या दिवशी अश्विन आणखी 3 विकेट घेत कपिल देवला मागे टाकू शकतो. (Photo: AFP)

5 / 5
Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.