AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका गमावल्यानंतर तीन खेळाडूंचा संघातून पत्ता कट! का ते जाणून घ्या

भारताने न्यूझीलंडविरुद्धची वनडे मालिका 1-2 ने गमावली. न्यूझीलंडने 37 वर्षानंतर भारतात वनडे मालिका जिंकली. त्यामुळे क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. काही खेळाडूंच्या सुमार कामगिरीमुळे भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या खेळाडूंचं वनडे संघातील स्थान डळमळीत झालं आहे.

| Updated on: Jan 19, 2026 | 7:20 PM
Share
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. ही मालिका न्यूझीलंडने 2-1 ने जिंकली. न्यूझीलंडने टीम इंडियाला भारत 37 वर्षानंतर पराभवाची धूळ चारली. मागच्या दौऱ्यात कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव केला होता. त्यामुळे भारताला न्यूझीलंडने आणखी एक जखम दिली. (Photo- BCCI Twitter)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका पार पडली. ही मालिका न्यूझीलंडने 2-1 ने जिंकली. न्यूझीलंडने टीम इंडियाला भारत 37 वर्षानंतर पराभवाची धूळ चारली. मागच्या दौऱ्यात कसोटी मालिकेत 3-0 ने पराभव केला होता. त्यामुळे भारताला न्यूझीलंडने आणखी एक जखम दिली. (Photo- BCCI Twitter)

1 / 5
मालिकेची सुरुवात भारताने विजयाने केली होती. पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. पण त्यानंतरच्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. विश्वासाच्या खेळाडूंनी केलेल्या सुमार कामगिरीचा फटका टीम इंडियाला बसला. त्यामुळे तीन खेळाडूंचा वनडे संघातील मार्ग बंद होण्याचा स्थिती आहे. (Photo- BCCI Twitter)

मालिकेची सुरुवात भारताने विजयाने केली होती. पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडला पराभूत केलं होतं. पण त्यानंतरच्या दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. विश्वासाच्या खेळाडूंनी केलेल्या सुमार कामगिरीचा फटका टीम इंडियाला बसला. त्यामुळे तीन खेळाडूंचा वनडे संघातील मार्ग बंद होण्याचा स्थिती आहे. (Photo- BCCI Twitter)

2 / 5
अष्टपैलू रवींद्र जडेजाने वनडे मालिकेत सुमार कामगिरीचं दर्शन घडवलं. फलंदाजी आणि गोलंदाजीतही योगदान देऊ शकला नाही. त्याला एकही विकेट मिळाली नाही. तर धावाही करू शकला नाही. मागच्या 10 वनडे सामन्यात रवींद्र जडेजाने फक्त 106 धावा केल्या. तसेच 10 विकेट मिळाल्या. (Photo- PTI)

अष्टपैलू रवींद्र जडेजाने वनडे मालिकेत सुमार कामगिरीचं दर्शन घडवलं. फलंदाजी आणि गोलंदाजीतही योगदान देऊ शकला नाही. त्याला एकही विकेट मिळाली नाही. तर धावाही करू शकला नाही. मागच्या 10 वनडे सामन्यात रवींद्र जडेजाने फक्त 106 धावा केल्या. तसेच 10 विकेट मिळाल्या. (Photo- PTI)

3 / 5
वॉशिंग्टन सुंदरच्या जागी नितीश कुमार रेड्डीला संधी दिली गेली. पण नितीशने अपेक्षाभंग केला. तिसऱ्या वनडे  सामन्यात अर्धशतक ठोकलं. पण पुढच्या मालिकेपर्यंत हार्दिक पांड्या फिट अँड फाईन होईल. त्यामुळे नितीशला संधी मिळणं कठीण आहे. (Photo- PTI)

वॉशिंग्टन सुंदरच्या जागी नितीश कुमार रेड्डीला संधी दिली गेली. पण नितीशने अपेक्षाभंग केला. तिसऱ्या वनडे सामन्यात अर्धशतक ठोकलं. पण पुढच्या मालिकेपर्यंत हार्दिक पांड्या फिट अँड फाईन होईल. त्यामुळे नितीशला संधी मिळणं कठीण आहे. (Photo- PTI)

4 / 5
वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला वारंवार संधी दिल्या जात आहेत. पण त्याच्या गोलंदाजीला काही धार चढताना दिसत नाही. त्यालाही संघातून वगळलं जाऊ शकतं. पहिल्या दोन सामन्याच सुमार कामगिरी केल्याने तिसऱ्या सामन्यात त्याला घेतलं नाही. त्याने फक्त तीन विकेट घेतल्या आणि खूप धावा दिल्या. (Photo- PTI)

वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला वारंवार संधी दिल्या जात आहेत. पण त्याच्या गोलंदाजीला काही धार चढताना दिसत नाही. त्यालाही संघातून वगळलं जाऊ शकतं. पहिल्या दोन सामन्याच सुमार कामगिरी केल्याने तिसऱ्या सामन्यात त्याला घेतलं नाही. त्याने फक्त तीन विकेट घेतल्या आणि खूप धावा दिल्या. (Photo- PTI)

5 / 5
Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.