AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराटची अवघ्या 20 लाखांपासून सुरुवात, 18 वर्षांत इतकी वाढली लिलावाची किंमत

विराट कोहली गेल्या अठरा वर्षांपासून आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू या टीमकडून खेळतोय. अठरा वर्षांनंतर त्याला पहिल्यांदाच जेतेपदाची चव चाखायला मिळाली. आयपीएलच्या लिलावात विराटला किती रक्कम आजवर मिळाली, ते पहा..

| Updated on: Jun 04, 2025 | 1:17 PM
Share
प्रतीक्षा.. 18 वर्षांची दीर्घ प्रतीक्षा.. 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) लाँचिंगपासून  या प्रतीक्षेची सुरुवात झाली. अखेर 3 जून 2025 रोजी ही प्रतीक्षा संपली. आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव केला. RCB ने 18 वर्षांनंतर हे जेतेपद पटकावलंय. त्याचसोबत विराट कोहलीच्याही आयुष्यात हा सुवर्णक्षण 18 वर्षांनंतर आला आहे.

प्रतीक्षा.. 18 वर्षांची दीर्घ प्रतीक्षा.. 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) लाँचिंगपासून या प्रतीक्षेची सुरुवात झाली. अखेर 3 जून 2025 रोजी ही प्रतीक्षा संपली. आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब किंग्जचा पराभव केला. RCB ने 18 वर्षांनंतर हे जेतेपद पटकावलंय. त्याचसोबत विराट कोहलीच्याही आयुष्यात हा सुवर्णक्षण 18 वर्षांनंतर आला आहे.

1 / 5
आरसीबीने विराट कोहलीवर तेव्हा पैज लावली होती, जेव्हा त्याने टीम इंडियामध्ये पदार्पणही केलं नव्हतं. 2008 मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हाच तो प्रकाशझोतात आला होता.

आरसीबीने विराट कोहलीवर तेव्हा पैज लावली होती, जेव्हा त्याने टीम इंडियामध्ये पदार्पणही केलं नव्हतं. 2008 मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकला होता. तेव्हाच तो प्रकाशझोतात आला होता.

2 / 5
विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव नसल्याने त्याला आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये आरसीबीने अवघ्या 20 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. पहिल्या सिझनमध्ये विराटची कामगिरी फार उल्लेखनीय नव्हती. पण 2010 पर्यंत त्याची कामगिरी सुधारली.

विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याचा अनुभव नसल्याने त्याला आयपीएलच्या पहिल्या सिझनमध्ये आरसीबीने अवघ्या 20 लाख रुपयांना खरेदी केलं होतं. पहिल्या सिझनमध्ये विराटची कामगिरी फार उल्लेखनीय नव्हती. पण 2010 पर्यंत त्याची कामगिरी सुधारली.

3 / 5
2011 मध्ये विराटला रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर 2014 ते 2017 पर्यंत त्याच्या लिलावाची रक्कम 12.50 कोटी रुपये इतकी होती. 2018 मध्ये ही रक्कम वाढून 17 कोटी रुपये इतकी झाली.

2011 मध्ये विराटला रॉयल चॅलेंजर्सचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यानंतर 2014 ते 2017 पर्यंत त्याच्या लिलावाची रक्कम 12.50 कोटी रुपये इतकी होती. 2018 मध्ये ही रक्कम वाढून 17 कोटी रुपये इतकी झाली.

4 / 5
2022, 2023 आणि 2024 मध्ये विराटचा लिलाव 15 कोटी रुपयांना झाला होता. दोन कोटींनी ही रक्कम कमी झाली होती. परंतु यंदाच्या आयपीएलमध्ये त्याचा लिलाव थेट 21 कोटींवर झाला. विराट गेल्या 18 वर्षांपासून आयपीएलमध्ये आरसीबीसाठीच खेळतोय.

2022, 2023 आणि 2024 मध्ये विराटचा लिलाव 15 कोटी रुपयांना झाला होता. दोन कोटींनी ही रक्कम कमी झाली होती. परंतु यंदाच्या आयपीएलमध्ये त्याचा लिलाव थेट 21 कोटींवर झाला. विराट गेल्या 18 वर्षांपासून आयपीएलमध्ये आरसीबीसाठीच खेळतोय.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.