AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोज सूर्यप्रकाशात तरीही व्हिटामिन D ची कमतरता? कारण वाचून धक्का बसणार

Vitamin D Deficiency : भारतात भरपूर सूर्यप्रकाश असतो. उन्हाळ्यात तर त्वचा पोळते, चटके बसतात. तरीही व्हिटामिन डी ची, ड जीवनसत्वाची का उणीव भासते. कारण तरी काय? याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे का?

| Updated on: Nov 09, 2025 | 4:11 PM
Share
भारतात भरपूर सूर्यप्रकाश आहे. अनेक जण सकाळच्या उन्हात फिरायला जातात. तरीही अनेकांना ड जीवनसत्वाची कमतरता भासते. या कमतरतेमुळे थकवा जाणवतो. हाडं ठिसूळ होतात. रोगप्रतिकार शक्ती कमी होते.

भारतात भरपूर सूर्यप्रकाश आहे. अनेक जण सकाळच्या उन्हात फिरायला जातात. तरीही अनेकांना ड जीवनसत्वाची कमतरता भासते. या कमतरतेमुळे थकवा जाणवतो. हाडं ठिसूळ होतात. रोगप्रतिकार शक्ती कमी होते.

1 / 6
पण सूर्यप्रकाशात रोज फिरल्याने ड जीवनसत्वाची कमतरता, उणीव भासणार नाही असे नाही. ड जीवनसत्व मिळवण्याचे ते एक माध्यम आहे. सध्या अनेकांची डी जीवनसत्व कमी झाल्याची तक्रार समोर येते. त्यामागे इतरही काही कारणं आहेत.

पण सूर्यप्रकाशात रोज फिरल्याने ड जीवनसत्वाची कमतरता, उणीव भासणार नाही असे नाही. ड जीवनसत्व मिळवण्याचे ते एक माध्यम आहे. सध्या अनेकांची डी जीवनसत्व कमी झाल्याची तक्रार समोर येते. त्यामागे इतरही काही कारणं आहेत.

2 / 6
किती ही खा शरीराला लागत नाही असं आपण म्हणतो. तेच डी जीवनसत्त्वाबाबत आहे. अनेकदा डी जीवनसत्व शरीरात शोषलंच जात नाही. त्यामुळे उन्हात फिरल्यावरही पंचनतंत्राच्या गडबडीमुळे डी जीवनसत्व शरिरात शोषले जात नाही. म्हणजेच काय तर शरीराला लागत नाही. त्यामुळे थकवा जाणवतो.

किती ही खा शरीराला लागत नाही असं आपण म्हणतो. तेच डी जीवनसत्त्वाबाबत आहे. अनेकदा डी जीवनसत्व शरीरात शोषलंच जात नाही. त्यामुळे उन्हात फिरल्यावरही पंचनतंत्राच्या गडबडीमुळे डी जीवनसत्व शरिरात शोषले जात नाही. म्हणजेच काय तर शरीराला लागत नाही. त्यामुळे थकवा जाणवतो.

3 / 6
तर दुसरा प्रकार म्हणजे चरबी वाढल्याने सुद्धा अनेक जीवनसत्व रक्तात विरघळत नाहीत. रक्तात पोहचत नाहीत आणि ती शरिराला ताकद देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे लठ्ठपणा हा आपल्या देशाचा नवीन शत्रू आहे. तसा तो व्हिटामिन डीचा पण शत्रू आहे.

तर दुसरा प्रकार म्हणजे चरबी वाढल्याने सुद्धा अनेक जीवनसत्व रक्तात विरघळत नाहीत. रक्तात पोहचत नाहीत आणि ती शरिराला ताकद देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे लठ्ठपणा हा आपल्या देशाचा नवीन शत्रू आहे. तसा तो व्हिटामिन डीचा पण शत्रू आहे.

4 / 6
आजकाल कोणते ना कोणते आजार सुरुच असतात. त्यासाठी औषधं आणि पथ्यपाणी करावं लागतं. गोळ्याऔषधी घ्याव्या लागतात. पण काही औषधांमुळे (anti epileptic drugs) डी जीवनसत्त्वाचे विघटन होते. व्हिटामिन डी ची कमतरता भासते.

आजकाल कोणते ना कोणते आजार सुरुच असतात. त्यासाठी औषधं आणि पथ्यपाणी करावं लागतं. गोळ्याऔषधी घ्याव्या लागतात. पण काही औषधांमुळे (anti epileptic drugs) डी जीवनसत्त्वाचे विघटन होते. व्हिटामिन डी ची कमतरता भासते.

5 / 6
जीनमध्ये बदल झाल्याने सुद्धा व्हिटामिन डी योग्यरित्या रक्तात पोहचत नाही. जीनचा हा दोष असतो. म्हणजे तुम्ही कितीही कोवळ्या उन्हात बसला तरी काही लोकांना त्याचा काहीही उपयोग होत नाही. अशावेळी वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घेणे फायद्याचे ठरू शकते.

जीनमध्ये बदल झाल्याने सुद्धा व्हिटामिन डी योग्यरित्या रक्तात पोहचत नाही. जीनचा हा दोष असतो. म्हणजे तुम्ही कितीही कोवळ्या उन्हात बसला तरी काही लोकांना त्याचा काहीही उपयोग होत नाही. अशावेळी वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला घेणे फायद्याचे ठरू शकते.

6 / 6
Follow Us
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट...
राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता? सुप्रीम कोर्टाची थेट याचिकाकर्त्यांनाच नोटीस; ED, CBI...