राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. मात्र या मतदानापूर्वी महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचे पहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले उमेदवार प्रफुल्ल पटेल यांच्यासाठी मतांचा कोटा बदलला आहे. शरद पवार यांनी ऐनवेळी केलेल्या या बदलामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांची मते धोक्यात आल्याचे बोलले जात आहेत. मात्र दुसरीकडे विजय शिवसेनेचाच होईल, आमचं पूर्ण नियोजन झाल्याचा दावा शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांनी केला आहे.