AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : एकदिवसीय मालिकेत कोणाचं पारडं जड? जाणून घ्या उभय संघांची आतापर्यंतची कामगिरी

दक्षिण आफ्रिका दौरा भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. येथे भारताला फारसे विजय मिळवता आले नाहीत. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेल्या चार एकदिवसीय मालिकेत भारताची स्थिती काय होती, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

| Edited By: | Updated on: Jan 17, 2022 | 11:42 AM
Share
दक्षिण आफ्रिका दौरा भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. येथे भारताला फारसे विजय मिळवता आले नाहीत. यावेळी भारत कसोटीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याच्या स्थितीत दिसत होता पण यजमानांनी फासे उलटवले. आता बुधवारपासून उभय संघांमधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. भारताने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मागील दौऱ्यात यजमानांचा पराभव केला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेल्या चार एकदिवसीय मालिकेत भारताची स्थिती काय होती, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

दक्षिण आफ्रिका दौरा भारतासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिला आहे. येथे भारताला फारसे विजय मिळवता आले नाहीत. यावेळी भारत कसोटीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करण्याच्या स्थितीत दिसत होता पण यजमानांनी फासे उलटवले. आता बुधवारपासून उभय संघांमधील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होत आहे. भारताने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या मागील दौऱ्यात यजमानांचा पराभव केला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेल्या चार एकदिवसीय मालिकेत भारताची स्थिती काय होती, हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1 / 5
2006-07 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. सध्या राहुल भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यावेळी ग्रेग चॅपल टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. या दौऱ्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताचा 4-0 असा पराभव केला होता. मालिकेतील पहिला सामना जोहान्सबर्ग येथे खेळला गेला, जो पावसामुळे गमावला गेला, अन्यथा हा आकडा 5-0 असा होऊ शकला असता. डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ 91 धावांवर ऑलआऊट झाला, इथून भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने तेव्हा केवळ एकच टी-20 सामना जिंकला होता.

2006-07 मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. सध्या राहुल भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्यावेळी ग्रेग चॅपल टीम इंडियाचे प्रशिक्षक होते. या दौऱ्यात भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने भारताचा 4-0 असा पराभव केला होता. मालिकेतील पहिला सामना जोहान्सबर्ग येथे खेळला गेला, जो पावसामुळे गमावला गेला, अन्यथा हा आकडा 5-0 असा होऊ शकला असता. डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघ 91 धावांवर ऑलआऊट झाला, इथून भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने तेव्हा केवळ एकच टी-20 सामना जिंकला होता.

2 / 5
2010-11 मध्ये भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला कडवे आव्हान दिले होते. पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने यजमानांच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. तिसऱ्या वनडेत युसूफ पठाणच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेने चौथा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली. शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका 2-3 ने गमावली.

2010-11 मध्ये भारताने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला कडवे आव्हान दिले होते. पहिल्या सामन्यात भारताचा पराभव झाला असला तरी जोहान्सबर्गमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने यजमानांच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. तिसऱ्या वनडेत युसूफ पठाणच्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारताने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेने चौथा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधली. शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात भारताचा पराभव झाला आणि मालिका 2-3 ने गमावली.

3 / 5
2013-14 मध्ये भारताने पुन्हा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. यावेळी भारतीय संघ भरपूर क्रिकेट खेळून दक्षिण आफ्रिकेत पोहोचला. ही मालिका क्विंटन डी कॉकचा उदय म्हणून लक्षात ठेवली जाते, ज्याने भारतीय गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केलं. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये डी कॉकने शतक झळकावले. जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात डी कॉकने 135 धावा केल्या आणि तो भारताच्या पराभवाचे कारण बनला. डर्बनमध्ये, त्याने 106 धावांची खेळी खेळून आपल्या संघाला 2-0 अशी अभेद्य आघाडी मिळवून दिली. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने आणखी एक शतक झळकावले पण पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही.

2013-14 मध्ये भारताने पुन्हा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. यावेळी भारतीय संघ भरपूर क्रिकेट खेळून दक्षिण आफ्रिकेत पोहोचला. ही मालिका क्विंटन डी कॉकचा उदय म्हणून लक्षात ठेवली जाते, ज्याने भारतीय गोलंदाजांवर जोरदार आक्रमण केलं. या मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये डी कॉकने शतक झळकावले. जोहान्सबर्ग येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात डी कॉकने 135 धावा केल्या आणि तो भारताच्या पराभवाचे कारण बनला. डर्बनमध्ये, त्याने 106 धावांची खेळी खेळून आपल्या संघाला 2-0 अशी अभेद्य आघाडी मिळवून दिली. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने आणखी एक शतक झळकावले पण पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही.

4 / 5
2017-18 मध्ये भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यावर, दोन संघांमध्ये सहा सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली ज्यामध्ये भारताने 5-1 ने विजय मिळवला. डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने विजय मिळवला. येथून भारताने सलग तीन सामने जिंकले. चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला पण त्यानंतर संघाने पुनरागमन करत उर्वरित दोन सामने जिंकून मालिका आपल्या ताब्यात घेतली.

2017-18 मध्ये भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यावर, दोन संघांमध्ये सहा सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली गेली ज्यामध्ये भारताने 5-1 ने विजय मिळवला. डर्बनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या वनडे सामन्यात कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने विजय मिळवला. येथून भारताने सलग तीन सामने जिंकले. चौथ्या सामन्यात भारताचा पराभव झाला पण त्यानंतर संघाने पुनरागमन करत उर्वरित दोन सामने जिंकून मालिका आपल्या ताब्यात घेतली.

5 / 5
Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.