AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्लेऑमध्ये बंगळुरुचा पराभव का झाला? विराटचं स्वप्न कसं भंगलं? या 4 चुका झाल्याने पहिल्या ट्रॉफीला हुलकावणी

आरसीबीने संपूर्ण लीग फेरीत उत्तम खेळ दाखवला पण सोमवारी लीग स्पर्धेतील फॉर्म कायम ठेवण्यात आरसीबीला अपयश आलं. खेळाडूंच्या काही चुका संघाला खूपच महागात पडल्या.

| Edited By: Akshay Adhav | Updated on: Oct 12, 2021 | 12:43 PM
Share
ओयन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील केकेआरने प्लेऑफच्या सामन्यात आरसीबीचा पराभव करत दुसऱ्या पात्रता फेरीत स्थान पक्के केले. कोलकात्याने आरसीबीला केवळ 138 धावांवर रोखलं आणि त्यानंतर, दोन चेंडू आणि चार विकेट शिल्लक असताना विजयही मिळविला. आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकात्याचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल. आरसीबीने संपूर्ण लीग फेरीत उत्तम खेळ दाखवला पण सोमवारी लीग स्पर्धेतील फॉर्म कायम ठेवण्यात आरसीबीला अपयश आलं. खेळाडूंच्या काही चुका संघाला खूपच महागात पडल्या.

ओयन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील केकेआरने प्लेऑफच्या सामन्यात आरसीबीचा पराभव करत दुसऱ्या पात्रता फेरीत स्थान पक्के केले. कोलकात्याने आरसीबीला केवळ 138 धावांवर रोखलं आणि त्यानंतर, दोन चेंडू आणि चार विकेट शिल्लक असताना विजयही मिळविला. आता दुसऱ्या क्वालिफायरमध्ये कोलकात्याचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होईल. आरसीबीने संपूर्ण लीग फेरीत उत्तम खेळ दाखवला पण सोमवारी लीग स्पर्धेतील फॉर्म कायम ठेवण्यात आरसीबीला अपयश आलं. खेळाडूंच्या काही चुका संघाला खूपच महागात पडल्या.

1 / 5
विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्याच्या अंगलट आला. त्याला वाटलं की खेळपट्टी हार्ड आहे आणि सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करणे कठीण होईल. मात्र, घडलं ते उलटंच. नाणेफेक गमावल्यानंतरही आम्हाला धावांचा पाठलागच करायचा होता, असं वक्तव्य करुन मॉर्गनने विराटला काही क्षण बुचकाळ्यात टाकलं. धावांचा पाठलाग करताना अनेक संघ विजय मिळवत असल्याचंही काही सामन्यांमध्ये दिसून आलंय. अशा परिस्थितीत कोहलीने आधी गोलंदाजी करणं अधिक फायद्याचं ठरलं असतं.

विराट कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो त्याच्या अंगलट आला. त्याला वाटलं की खेळपट्टी हार्ड आहे आणि सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजी करणे कठीण होईल. मात्र, घडलं ते उलटंच. नाणेफेक गमावल्यानंतरही आम्हाला धावांचा पाठलागच करायचा होता, असं वक्तव्य करुन मॉर्गनने विराटला काही क्षण बुचकाळ्यात टाकलं. धावांचा पाठलाग करताना अनेक संघ विजय मिळवत असल्याचंही काही सामन्यांमध्ये दिसून आलंय. अशा परिस्थितीत कोहलीने आधी गोलंदाजी करणं अधिक फायद्याचं ठरलं असतं.

2 / 5
सुनीर नरेनने या सामन्यात अष्टपैलू खेळ दाखवला, ज्यामुळे विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलला सेट होण्याची संधी मिळाली नाही. अर्थात त्याचमुळे संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. नरेनने 4 षटकांत 21 धावा देऊन 4 बळी घेतले. त्यानंतर त्याने फलंदाजीमध्येही चमत्कार केला. त्याने 15 चेंडूत 26 धावांच्या डावात तीन षटकार ठोकले, ज्यामुळे तो बाद झाल्यानंतरही संघावर दबाव आला नाही.

सुनीर नरेनने या सामन्यात अष्टपैलू खेळ दाखवला, ज्यामुळे विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलला सेट होण्याची संधी मिळाली नाही. अर्थात त्याचमुळे संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला. नरेनने 4 षटकांत 21 धावा देऊन 4 बळी घेतले. त्यानंतर त्याने फलंदाजीमध्येही चमत्कार केला. त्याने 15 चेंडूत 26 धावांच्या डावात तीन षटकार ठोकले, ज्यामुळे तो बाद झाल्यानंतरही संघावर दबाव आला नाही.

3 / 5
आरसीबीने गोलंदाजी करताना दोन महत्त्वाचे झेल सोडले ज्यामुळे त्यांचा सामन्यात पुनरागमन करण्याचा मार्ग जरासा अवघड झाला. नवव्या षटकात अहमद शहजादने मॅक्सवेलच्या पहिल्याच चेंडूवर व्यंकटेश अय्यरचा झेल सोडला. 17 व्या षटकात पडिकलने सुनील नरेनचा झेल सोडला. पाठोपाठ दोन विकेट्स घेऊन आरसीबी या सामन्यात पुनरागमन करु शकला असता. मात्र तसं झालं नाही.

आरसीबीने गोलंदाजी करताना दोन महत्त्वाचे झेल सोडले ज्यामुळे त्यांचा सामन्यात पुनरागमन करण्याचा मार्ग जरासा अवघड झाला. नवव्या षटकात अहमद शहजादने मॅक्सवेलच्या पहिल्याच चेंडूवर व्यंकटेश अय्यरचा झेल सोडला. 17 व्या षटकात पडिकलने सुनील नरेनचा झेल सोडला. पाठोपाठ दोन विकेट्स घेऊन आरसीबी या सामन्यात पुनरागमन करु शकला असता. मात्र तसं झालं नाही.

4 / 5
विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी आरसीबीला झटपट सुरुवात करुन दिली. दोघांनी पाच षटकांत 49 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर संघाला त्याचा फायदा उठवता आला नाही. सलामीची जोडी वगळता एकही फलंदाज 20 आकडाही पार करू शकला नाही. एबी डिव्हिलियर्स व्यतिरिक्त, शेवटच्या सामन्यातील मॅच विनर खेळाडू श्रीकर भारत आणि शाहबाज अहमदही चमकदार कामगिरी करु शकले नाहीत, ज्यामुळे संघ 20 षटकांत फक्त 138 धावा करू शकला.

विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांनी आरसीबीला झटपट सुरुवात करुन दिली. दोघांनी पाच षटकांत 49 धावा केल्या होत्या. पण त्यानंतर संघाला त्याचा फायदा उठवता आला नाही. सलामीची जोडी वगळता एकही फलंदाज 20 आकडाही पार करू शकला नाही. एबी डिव्हिलियर्स व्यतिरिक्त, शेवटच्या सामन्यातील मॅच विनर खेळाडू श्रीकर भारत आणि शाहबाज अहमदही चमकदार कामगिरी करु शकले नाहीत, ज्यामुळे संघ 20 षटकांत फक्त 138 धावा करू शकला.

5 / 5
Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची...

Maharashtra Rains, Weather Update : महाराष्ट्रात धो धो पाऊस, या जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर, 16 गावांचा संपर्क तुटला, 48 तास धोक्याची..

मारा.. मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला, दिल्लीतील हादरवणारी व्हिडीओ...

मारा.. मारा.. मारा.. 300-400 तरुणांच्या घोळक्याने चढवला पोलिसांवर हल्ला, दिल्लीतील हादरवणारी व्हिडीओ..

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट.

CJP Protest: धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार नाही पण… मोदी सरकारच्या मनात काय? मोठी अपडेट

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?.

Vaibhav Sooryavanshi: झिम्बाब्वेविरुद्ध मालिकेत वैभवला झंझावात खेळी करावीच लागणार, असं नाही केलं तर…काय घडणार?

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?.

Sharad Pawar : आधी जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद, नंतर पंतप्रधानांची भेट; शरद पवारांच्या दुहेरी चालीने विरोधकही धास्तावले?

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक.

Maharashtra News : राजधानीतील आंदोलनाचे महाराष्ट्रातही पडसाद, वंचित बहुजन आघाडीकडून ‘महाराष्ट्र बंद’ची हाक