AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चौथ्या पराभवानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे संतापला, पराजयाचं खापर असं फोडलं

आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्सची पराभवाची मालिका सुरू आहे. मधला सामना पावसामुळे रद्द झाला. पण पाच पैकी चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. असं असताना कर्णधार अजिंक्य रहाणेचा संताप झाला आहे.

चौथ्या पराभवानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे संतापला, पराजयाचं खापर असं फोडलं
चौथ्या पराभवानंतर केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे संतापला, पराजयाचं खापर असं फोडलंImage Credit source: KKR Twitter
| Updated on: Apr 15, 2026 | 4:04 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेतील 22 व्या सामन्या कोलकाता नाईट रायर्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सने प्रथम गोलंदाजी स्वीकारली.खरं तर या सामन्यात कोलकात्यावर विजयाचं दडपण होतं. सामन्यात झालंही तसंच.. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 32 धावांनी केकेआरला पराभवाची धूळ चारली. खरं तर या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने दिलेलं लक्ष्य सहज गाठण्यासारखं होतं. दव पडला होता आणि केकेआरला त्याचा फायदा झाला असता. पण तसं झालं नाही. केकेआरचे फलंदाज एक एक करत बाद झाले आणि धावांचं अंतर वाढत गेलं. या पराभवानंतर कर्णधार अजिंक्य रहाणेचं भाष्य समोर आलं आहे. यात त्याने पराभवाचं खापर फलंदाजांवर फोडलं आहे.

काय म्हणाला अजिंक्य रहाणे?

चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध पराभव होताच केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने फलंदाजांना पराभवासाठी जबाबदार ठरलं. अजिंक्य रहाणे म्हणाला की, ‘मला वाटतं, गोलंदाजीमध्ये आम्ही खूप चांगली कामगिरी केली. या खेळपट्टीवर 190 धावांवर रोखणं ही खूप चांगली गोष्ट होती. विशेषतः पॉवरप्लेमध्ये त्यांनी 70 पेक्षा जास्त धावा केल्या होत्या. त्यानंतर धावसंख्या 190 पर्यंत रोखून धरणे हे आमच्या गोलंदाजी युनिटचे अप्रतिम काम होते. मला वाटतं, सुरुवातीला आमच्या फलंदाजीने पॉवरप्लेमध्ये फक्त 36 किंवा 37 धावा केल्या. मला वाटतं ते खूप महत्त्वाचं होतं. मधल्या टप्प्यात, फिरकी गोलंदाजांना फटके मारणे थोडे आव्हानात्मक होते, पण त्याव्यतिरिक्त, खेळपट्टी खरोखरच चांगली होती. आम्हाला एका फलंदाजाची गरज होती जो शेवटपर्यंत फलंदाजी करून शेवटी सामना जिंकून देईल.’

अजिंक्य रहाणे याने संघातील काही चुका सुधारणांबाबत सांगितलं की, ‘मला वाटतं, संघरचनेच्या बाबतीत, मागच्या आणि या सामन्यात जी संघरचना होती ती खूप चांगली होती. मला वाटतं सध्या परिस्थिती कठीण आहे. आम्ही सामने जिंकत नाहीये, हे कठीण आहे. एक गट म्हणून आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे आहे की आपण सकारात्मक राहावे. आत्मविश्वास टिकवून ठेवावा आणि फक्त वर्तमानावर लक्ष केंद्रित करावे.संघरचनेत आम्हाला काही बदल करावे लागतील. कधीकधी तुम्ही खेळाडूंना पाठिंबा देता, जर निकाल तुमच्या बाजूने लागत असतील, तर ते ठीक आहे. पण जर निकाल तुमच्या बाजूने लागत नसतील, तर तुम्हाला संघरचनेबद्दल विचार करावा लागेल. पण त्याव्यतिरिक्त, मला वाटतं की सकारात्मक राहणं आणि खचून न जाणं हेच महत्त्वाचं आहे.’

Follow Us
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय.
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र.
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार.
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.