मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. काही कर्मचारी कामावर परतले आहेत, मात्र अद्यापही अनेक कर्मचारी संपावर ठाम आहेत. कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे एसटी सेवा पूर्ण क्षमतेने सुरू करता येणे शक्य होत नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज एसटी संपावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आवाहन केले आहे. आम्हाला जेवढी मदत शक्य होती तेवढी मदत केली. आता कामावर परत या असे अजित पवार यांनी कर्मचाऱ्यांना म्हटले आहे.