नागपूर : नागपूरमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. नागपूरच्या काही भागात राखयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. या राखयुक्त पाण्यामुळे नागपूरकरांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या वारेगाव अॅशपॉन्डमधून राख लिकेज होत आहे. ही राख त्यानंतर थेट कन्हन नदीत मिसळत आहे. त्यामुळे आता नागपूरकरांवर राखयुक्त पाणी पिण्याची वेळ आली आहे.