मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर कारवाई करण्याची तयारी औरंगाबाद पोलिसांनी सुरु केल्याची माहिती हाती आली आहे. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी देण्यापूर्वी पोलिसांनी काही अटी आणि शर्थी मनसेसमोर ठेवल्या होत्या. त्या अटींचं पालन करू, असं आश्वासनही मनसे नेत्यांनी दिलं होतं. मात्र राज ठाकरे यांच्या सभेत तीन प्रमुख अटींचं उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार, या भाषणाचं पोस्टमॉर्टेम पोलिसांकडून (Aurangabad Police) केलं जात आहे.