आग लागली की धूर निघतो , भाजपच्या मूकमोर्चावर अविनाश अभ्यंकरांचे टीकास्त्र

आग लागली की धूर निघतो , भाजपच्या मूकमोर्चावर अविनाश अभ्यंकरांचे टीकास्त्र

| Updated on: Nov 01, 2025 | 2:13 PM

मनसेचे वरिष्ठ नेते अविनाश अभ्यंकर यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीतील घोळावर आवाज उठवला आहे. ते म्हणाले की, याद्या दुरुस्त केल्याशिवाय निवडणुकांची घाई करू नये. भाजपने याविरोधात काढलेल्या मुकमोर्चावर टीका करताना अभ्यंकर यांनी, "आग लागली की धूर निघतो" असे म्हटले. निवडणूक आयोगाने या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी त्यांची मागणी आहे.

मनसेचे वरिष्ठ नेते अविनाश अभ्यंकर यांनी महाराष्ट्रातील मतदार यादीतील कथित अनियमिततेच्या विरोधात सुरू असलेल्या सत्याचा मोर्चा या आंदोलनावर आपली भूमिका स्पष्ट केली. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी या मोर्चाला जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत असल्याचे नमूद केले. हा केवळ एक राजकीय मोर्चा नसून, असत्याविरुद्ध सत्यासाठीचा संघर्ष असल्याचे ते म्हणाले. या मोर्चाचा संदेश दिल्लीपर्यंत पोहोचल्याचा दावा करत, निवडणूक आयोगाने या गंभीर विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी त्यांची मागणी आहे.

सत्ताधारी भाजपने काढलेल्या मुकमोर्चावर अविनाश अभ्यंकर यांनी तीव्र शब्दांत हल्लाबोल केला. “आग लागली की धूर निघतो”, असं म्हणत त्यांनी मतदार यादीत गडबड असल्याचा आरोप केला. भाजपच्याच मंदाताई म्हात्रे आणि मुश्रीफ साहेब यांसारख्या नेत्यांनीही मतदार यादीत घोळ असल्याची कबुली दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

Published on: Nov 01, 2025 02:13 PM