मुंबई: “सत्तेसाठी भाजपा कधीच त्या ठिकाणी नसते. हे देशभरातील अनेक उदहारणातून दिसून आलय. महाराष्ट्रात आता सत्तांतर झालं. भाजपा मोठा पक्ष असताना, मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदेंना दिलं. धोका देण्याची पार्श्वभूमी शिवसेनेची आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपाच्या पाठित खंजीर खुपसला” अशी टीका भाजपा नेते प्रवीण दरेकर यांनी केली.