द्वेष,व्यक्तिगत आरोपांची धुळवड लोकशाहीत अभिप्रेत नसते : Balasaheb Thorat
सध्या सुरू असलेली राजकीय धुळवड दुर्दैवी आहे. व्यक्तीद्वेष, व्यक्तिगत आरोपाची धुळवड लोकशाहीला अभिप्रेत नाही. मात्र ही राजकीय धुळवड योग्य नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
माणसामाणसात भेद निर्माण करणं, विष कालवणं हे राज्यघटनेस मान्य नाही. म्हणून भाजपला सत्तेवर येऊ देणार नाही, असं शरद पवारांनी म्हटलं असावं, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. धुळवड हा 365 दिवसांपैकी 2 दिवसांचा सण आहे. नंतर ती नसायला हवी. सध्या सुरू असलेली राजकीय धुळवड दुर्दैवी आहे. व्यक्तीद्वेष, व्यक्तिगत आरोपाची धुळवड लोकशाहीला अभिप्रेत नाही. मात्र ही राजकीय धुळवड योग्य नाही, असंही त्यांनी सांगितलं.
