मुंबई : विधान परिषद निवडणुकीवरुन भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. भाजपने गुरुवारी संध्याकाळी विधान परिषदेसाठी संध्याकाळीही बैठक घेतली होती. या बैठकीनंतर मीडियाशी संवाद साधताना आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीचा पराभव अटळ असल्याचे म्हटले आहे. तसेच नाना पटोलेंवरही टीका केली आहे.