मुंबई : उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा ‘मोगॅम्बो’ असा उल्लेख केला होता. कितीही पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, असेही वारंवार उद्धव ठाकरे विरोधकांना आपल्या भाषणातून ठणकावून सांगताना दिसतात. या टीकेला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना कोणाला संपवायची आहे, उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाची पूर्ती वाट लागलेली आहे. उद्धव ठाकरे हे समोरच्या राजकीय नेत्याविषयी कोणत्याही भाषेत बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. असंस्कृत मुख्यमंत्री म्हणून त्यांची महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद झालेली आहे, असे अतुल भातखळकर म्हणाले. यासह पुढे ते असेही म्हणाले की, आपला जीव किती आपण बोलतो कीती, अशी खोचक टीका अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.