मुंबई : नाशिकमधील राजकारण चांगलेच तापले आहे. येथे शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर चांगलीच टीका केली. भाजीपाला विकणारे छगन भुजबळ 25 वर्षात 25 हजार कोटी रुपयांचे मालक कसे झाले ? असा आरोप कांदे यांनी केलाय.