केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांनी भारतीय घटना वाचावी. मुख्यमंत्र्यांची कर्तव्ये काय आहेत, हे त्यांनी समजून घ्यावं, असा टोला त्यांनी लगावला आहे. राणे म्हणाले की, अडीच वर्षे झाली यांच्या सरकारला तरी त्यांना एबीसीडी कळलेली नाही. कायद्यात नसतात त्या गोष्टी ठाकरे सरकार बोलत आहे. सामना किंवा शिवसेनेला हिंदुत्वावर बोलायचा अधिकार नाही. दारू, मटका जुगार यावर बंदी आहे, ते तसंच असलं पाहिजे. कायद्यात नसतात त्या गोष्टी ठाकरे सरकार बोलत आहे, अशी टीका राणे यांनी केली आहे. (CM Uddhav Thackeray should read Indian constitution says Narayan Rane)