इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा; मंत्री गुलाबराव पाटील यांचं वक्तव्य

| Updated on: Apr 04, 2023 | 1:05 PM

Gulabrao Patil on Vande Mataram : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांची महाविकास आघाडीवर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...

Follow us on

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावमध्ये बोलताना एक वक्तव्य केलं आहे. त्याची सध्या चर्चा होतेय. “इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा”, असं गुलाबराव पाटील म्हणाले. दंगलीच्या घटनेनंतर गुलाबराव पाटील यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. “आमच्या सरकारला बदनाम करण्याचा काही लोकांनी विडा उचललाय”, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर टीका केलीय. महाविकास आघाडी केवळ टीका करण्याचं काम करत आहे. पण आम्ही लोकहिताची कामं करत आहोत. जनता आमच्या पाठीशी आहे, असंही गुलाबराव पाटील म्हणाले आहेत.