मुंबई : राज्यातील सत्तानाट्याची लढाई सुप्रीम कोर्टात पोहचली असून यावर 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. शिवसेनेने आणि शिंदे गटाने दाखल केलेल्या चार याचिकांवर 20 जुलैपासून सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती एन व्ही रमना, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हेमा कोहली या तीन न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे होणार आहे.